Blog

ठाण्यातील पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीसाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने लाक्षणिक उपोषण

सिव्हिल हॉस्पिटलसमोरील इमारत क्रमांक दोनच्या गच्चीचा भाग शनिवारी (ता. ६) सायंकाळी कोसळल्याने पोलिस कुटुंबीय धास्तावले आहेत. पोलिस वसाहतींत राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारातून घरभाडेपट्टी व देखभाल खर्च घेतला जात असतानाही या इमारतींची व्यवस्थित देखभाल किंवा दुरुस्ती केली जात नव्हती. या इमारती ६० वर्षे जुन्या आहेत. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा नियम असतानाही एकही ऑडिट करण्यात आलेले नाही. या इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्बाधणी करणे आवश्यक आहे. दरम्यान, धोकादायक इमारतींतील जिने, व्हरांडे यांची स्थिती पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. इमारत क्रमांक २ मधील गच्चीचा कोबा तोडून केलेल्या दुरुस्तीमुळे पावसाळ्यात घरांत पाणी गळते, अशी तक्रार या इमारतीतील रहिवाशांनी केली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने संबंधित विभागास युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत व या वसाहतीतील पोलिस कुटुंबांचे जीवन सुसह्य करावे, या मागणीसंदर्भात ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने गुरुवार दि. ११ डिसेंबर-२०१४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान सरकारी विश्रामगृह, ठाणे येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

उल्हासनगर येथे मोफत हृद्यविकार तपासणी शिबीर

, , ,

‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘गोदरेज मेमोरियल रूग्णालय’’ यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उल्हासनगर येथे मोफत हृद्याविकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

या शिबीरात भगव्या व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना रक्तदाब तपासणी (३० वर्षावरील व्यक्तींसाठी), मधुमेह तपासणी (३० वर्षावरील व्यक्तींसाठी), डॉक्टरी सल्ल्यानुसार ECG (हृद्यास्पंदनालेख) तपासणी आदी तपासण्या व डॉक्टरांचा सल्ला मोफत देण्यात येणार आहे. सदर शिबीर रविवार, दि. ७ डिसेंबर-२०१४ रोजी, सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० यावेळेत, साईनाथ मित्र मंडळ, एमआयडीसी वॉटर टँक रोड, बिर्ला मंदिर, शिवनेरी नगर, उल्हासनगर-1 या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक लोकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘‘धर्मराज्य पक्षा’’चे उल्हासनगर (शहर) विधानसभा अध्यक्ष गौतम बस्ते यांनी केले आहे.

इडिकॉन, मुंबई कामगारांना मिळणार रूपये १४,४४०/- रूपयांची भरघोस वाढ.

, , , , ,

मुंबईतील गोरेगांव येथील मे. इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापन आणि राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’’ यांच्यात, त्रैवार्षिक पगारवाढीचा विक्रमी करार संपन्न झाला. या करारामुळे, ‘‘इडिकॉन’’ कामगारांना रूपये १४,४४०/- रूपयांची भरघोस वाढ मिळणार आहे.

मुंबईतील गोरेगांव येथील मे. इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापन आणि राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’’ यांच्यात १ जानेवारी-२०१४ ते ३१ डिसेंबर-२०१६ या त्रैवार्षिक पगार वाढीचा करार संपन्न झाला. यानुसार किमान रूपये 10,000/- तर, कमाल वाढ रू. 4,440/- इतकी वाढ करण्यात आलेली आहे. सदर पगारवाढीपैकी 70 टक्के रक्कम बेसिक व उर्वरीत 30 टक्के रक्कम इतर भत्यात समाविष्ट करण्यात खास कामगार हिताचा फॉर्म्युला अमलांत आलेला असून पूर्ण वाढीव रक्कम ही 50:25:25 या पध्दतीने तीन वर्षात देण्यात येईल. या करारानुसार 5 ते 10 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना 15 दिवसाची ग्रॅच्युईटी, तर 10 ते 15 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना 20 दिवसाची ग्रच्युईटी, तसेच 15 ते 20 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना 25 दिवासांची ग्रच्युईटी देण्यात आली, हे या कराराचे खास वैशिष्ट्या आहे. त्याचप्रमाणे निवृत्तीची वयोमर्यादा 58 वर्षावरून 60 वर्ष अशी 2 वर्षांने वाढविण्यात आली आहे. तसेच 22 कंत्राटी कामगारांपैकी 9 कामगारांना परमनंट केले असून उर्वरीत 14 कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देऊन, त्या कामगारांना सेवाकाळाप्रमाणे 20 लाख 50 हजार रूपयांची भरपाई देण्यात आली.

इडिकॉन कंपनीच्या वतीने करार करतांना, कंपनीचे मालक श्री. ऑब्री, व्यवस्थापक श्री. पद्माकर आठवले, श्री. मेलवीन फर्नांडीस हजर होते, तर ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या वतीने अध्यक्ष राजन राजे, महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव रूपेश पवार, खजिनदार अण्णा साळुंखे इत्यादी पदाधिकारी तसेच, कंपनी युनिटचे कमिटी सदस्य उपस्थित होते.

कराराप्रसंगी बोलतांना, महासंघाचे अध्यक्ष राजन राजे म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलमुळे, प्रती महिना रूपये 5,000/- ते 6,000/- चे वेतन देऊन, कामगारांची लुट करून, कंत्राटदारी-मजूरीसारख्या गुलामगिरीला व नव-अस्पृश्यतेला कामगारांना तोंड द्यावे लागणार आहे. अशावेळी महाराष्ट्रातल्या मराठी कामगारांमध्ये, राजकीय जागृतीचे भान, या करारामुळे येईल आणि महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तीच, महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मुळावर आलेले चित्र बदलेल आणि या करारामुळे नवीन गती प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. सामान्य जनतेच्या दृष्टीने अत्यंत घातकी असलेल्या, खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण (खाउजा) या आर्थिक सुधारणांच्या तडाख्याने चैतन्यहीन झालेल्या कामगार चळवळीत केशव सुतांच्या तुतारीप्रमाणे ‘‘प्राण फुंकणारा’’ असा हा ‘इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि.’ व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’मधील क्रांतीकारी-करार असल्याचे कामगार क्षेत्रांत बोलले जात आहे. या करारानंतर, इडिकॉन, मुंबई येथील कंपनीतील कामगारांनी एकमेकांना मिठाई भरवून भरघोस पगारवाढीची दिवाळी साजरी केली.

धर्मराज्य पक्ष’ वाटणार ‘चिमण्यांची घरटी

जागतिक चिमणी दिनानिमित्त, भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’, 20 मार्च रोजी, पर्यावरण संरक्षणासाठी वाया गेलेल्या लाकूडफाट्यातून शेकडो ‘चिमण्यांची घरटी’, गृहसंकुल-चाळीत वाटणार असल्याची माहिती ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी दिलीय. गेली तीन वर्षे हा उपक्रम ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने सुरू आहे.

चिमण्या, या पर्यावरणातील बदलांबाबत खूपच संवेदनशील असतात. धूर, दूषित पाणी, कर्णकर्कश आवाज, मोबाईल फोनची किरणे, प्रदूषित वातावरण, चिमण्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. जगभरात चिमण्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी, शिसारहित पेट्रोलमध्ये ‘मिथेल टेरिटेरी ब्यूटेल इथर’ या अॅण्टी नॉकिंग एजंट म्हणून काम करणाऱ्या पदार्थामुळे लहान पिलांसाठी पोषक असलेले वातावरणातील लहान किडे मारले जातात. लहान वयात हे किडे न मिळाल्यामुळे चिमण्यांचा बालमृत्यू दर वाढला आहे. वृक्षतोडीमुळे झाडे, गवत, पालापाचोळा उपलब्ध नाही. यामुळे चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी जागा शिल्लक नाही आणि घरटे तयार करण्यासाठी कच्चा मालही उपलब्ध नाही! सिमेंटच्या घरांमुळे घराबाहेरही घरट्यांसाठी जागा नाही!! पूर्वी अंगणात धान्य वाळवले जात असे. अंगणातच भांडी धुतली जायची यामुळे धान्य आणि अन्नाचे कण हे चिमण्यांचे खाद्या असायचे पण फ्लॅट संस्कृतीमुळे घराला अंगण राहिलेले नाही. झाडांवर जागा नाही आणि बाहेर ससाणा&कावळा सारख्या शत्रूंचा सामना तर साप, इतर पक्ष्यांमुळे चिमण्यांची अंडी भक्ष्य बनलेली! यामुळे आपल्या मित्रांना आपण शत्रूंच्या हाती सोपविलेय! गेल्या 10 वर्षात भारतातील शहरी भागात चिमण्यांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत तर ग्रामिण भागात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत घटली आहे, अशी दाहक स्थिती असल्याचं राजन राजे यांनी स्पष्ट केलं.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी ‘चिमणी’ हा निसर्गाचा अत्यंत आवश्यक घटक आहे. यामुळे चिमण्यांच्या संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी आपली आहे. यासाठी 20 मार्च जागतिक चिमणी दिनाचं औचित्य साधून भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे पर्यावरण संरक्षणासाठी, वाया गेलेल्या लाकूडफाट्यातून शेकडो ‘चिमण्यांची घरटी’ वाटून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला जाणार आहे. ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे सतत तीन वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रिकाम्या खोक्यांना छिद्र पाडून, बोळके, रिकाम्या बाटल्या आदींचा वापर करूनही ‘चिमण्यांची घरटी’ बनविता येतात. अशी घरटी गॅलरीत ठेऊन एका वाटीत धान्य आणि एका वाटीत पाणी ठेवल्यास दाणे वेचण्यासाठी हळूहळू चिमण्या येथे नियमित येतात. उन्हाळ्यात पाण्याअभावी चिमण्यांचा तडफडून मृत्यू होतो. तेव्हा गॅलरी, पोर्च, पार्किंग, कोपऱ्यात जेथे शक्य आहे, तिथे पाण्याची वाटी ठेऊन चिमण्यांना जीवदान द्या, असे आवाहनही राजन राजे यांनी केले.

आदर्श अहवाल जाहीर करून तत्काळ अंमलबजावणीची ‘धर्मराज्य पक्षा’ची मागणी

दि. २१ आदर्श अहवाल जाहीर करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करा आणि कलंकित मंत्री तसेच वशिलेबाज अधिकारी या भ्रष्टाचाऱ्यांना कडक शिक्षा करा अशी संतप्त मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी केलीय.

SONY DSC

आदर्श इमारतीतील घोटाळ्याला जबाबदार कलंकित मंत्र्यांना आणि वशिलेबाज अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आदर्श घोटाळ्यातील चौकशी अहवाल फेटाळून लावला आहे. तर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अटक करण्याची सीबीआयला परवानगी नाकारली आहे. आदर्श घोटाळ्यातील भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्याचा प्रकार संतापजनक आहे. जनतेच्या मताला आपण काडीची किंमत देत नाही हे कॉग्रेस आघाडीच्या सरकारने याद्वारे दाखवून दिले आहे. यामुळे ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कचेरीवर संतप्त निदर्शने करण्यात आल्याचं राजन राजे यांनी म्हटल.

आदर्श घोटाळ्यातील चौकशी अहवाल जाहीर करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी आणि कलंकित मंत्री तसेच वशिलेबाज अधिकारी या भ्रष्टाचाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ‘धर्मराज्य पक्षा’ने केली आहे.

धर्मराज्य निबंध स्पर्धा – ७२५ सायकलींचे बक्षीस

भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने पर्यावरण विषयाला चालना देण्यासाठी ‘मी सायकल चालविण्याचा निर्धार केलाय कारण…’ या विषयावर न्यू इंग्लिश स्कूल ठाणे येथे गुरूवारी सकाळी १० : ०० वाजता भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना ७२५सायकलींचे बक्षीसरूपाने वाटप होणार आहे.

आरोग्य व पर्यावरण संरक्षणाचे प्रभावी साधन, वाहतूक कोंडीवरील सुलभ उपाय, हृदयरोग, मधुमेह, अस्थमा आदी रोगांवरील परिणामकारक उपाय, उत्तम शारिरीक व्यायाम, प्रदूषणावर परिणामकारक उपायासंदर्भात महत्त्वाचा असलेल्या ‘मी सायकल चालविण्याचा निर्धार केलाय कारण…’ या विषयांतर्गत ‘धर्मराज्य पक्षा’ने ‘भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ५ वी ते ७ वी व ८ वी ते १० असे दोन शालेय गट आणि महाविद्यालयीन गट अशा तीनही गटांतील विजेत्या स्पर्धक मुलींना ३६५ आणि मुलांना ३६० असे रू. ४,५००/- किंमतीचे एकूण ७२५ सायकलींचे बक्षीसरूपाने वाटप कले जाणार आहे. तसेच निबंध स्पर्धेतील सहभागी होणाऱ्या सर्वच मुला-मुलींना ‘दिवाळीची विशेष भेट’ आणि ‘प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे.

गुरूवार, दि. १४ नोव्हेंबर २०१३ रोजी, सकाळी १० वाजता न्यू इंग्लिश स्कूल, राममारूती रोड, ठाणे (प.) येथे ही निबंध स्पर्धा घेतली जाईल. स्पर्धेतील सहभागासाठी जयेंद्र जोग (98209 13925), राजेश गडकर (93246 81224) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव राजू फणसे यांनी केले आहे.

यवतमाळयेथील मुलींच्या लैंगिक शोषणाच्या निषेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’ची ठाण्यात तीव्र निदर्शने

ठाणे (प्रतिनिधी): यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीच्या ‘यवतमाळ पब्लिक स्कूल’मधील, अल्पवयीन विद्यार्थिनींचे शाळेतील शिक्षकांनीच लैंगिक शोषण केल्याची संतापजनक आणि घृणास्पद घटना घडलेली असल्याने, संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण असून, विद्यादानासारख्या पवित्र क्षेत्रात घडलेल्या या घटनेमुळे शिक्षकी पेशाला काळीमा फासला गेलाय. गेल्या काही

महिन्यात राज्यातील विविध ठिकाणी, अल्पवयीन विद्यार्थिनींचे शाळेच्या आवारात लैंगिक शोषण होण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे कि नाही याबाबतचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, या घृणास्पद घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी मंगळवारी ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर (पश्चिम), वाहतूक पोलीस चौकीशेजारील पदपथावर निदर्शने करण्यात आली. याप्रकरणी शिक्षण संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांना अटक केली असली तरी, बलात्कारी प्रवृत्तीला संरक्षण देणाऱ्या संपूर्ण दर्डा कुटुंबियांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली.

दरम्यान स्वतःच्याच शाळेतील १४ अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण हे फक्त शिक्षकी पेशालाच नव्हे, तर अवघ्या मानवजातीलाच काळीमा फासणारे दुष्कर्म असून, विजय दर्डा यांची ‘काँग्रेसी संस्कृती’ हीच का ? असा सवाल यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना उपस्थित केला. दुर्दैवाने गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील विविध भागातील शाळांमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. याचाच अर्थ राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक आता गुंडांबरोबर शिक्षण क्षेत्रातील नराधमांनादेखील राहिलेला नसल्याचा आरोप यावेळी राजेश गडकर यांनी केला. या घृणास्पद घटनेतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा ठोठवावी तसेच याप्रकरणी संपूर्ण दर्डा कुटुंबियांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने आक्रमकपणे करण्यात आली. या निदर्शनावेळी ठाणे स्टेशन परिसरातील नागरीकांमार्फत स्वाक्षरी मोहीम राबवून घंटानाद करण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, ‘धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाचे महासचिव महेशसिंग ठाकूर, पक्षाचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष सचिन शेट्टी, नरेंद्र पंडित, मुरबाड विधानसभा अध्यक्ष भरत हलपतराव, ठाणे विधानसभा सचिव विजय भोसले, सह-सचिव चंद्रकांत येरुणकर, नौपाडा प्रभाग अध्यक्ष समीर कालगुडे, लोकमान्य नगर प्रभाग अध्यक्ष महेश क्षीरसागर, पाचपाखाडी प्रभाग अध्यक्ष अमित लीबे, ‘धर्मराज्य शिक्षक शिक्षकेतर संघटने’च्या महासचिव साक्षी शिंदे, पक्षाच्या महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा जयश्री पंडित, सचिव दर्शना पाटील,नवी मुंबई महिला अध्यक्षा शीतल कोळी, रुपेश पवार, दिनेश चिकणे, नितीन उगले आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. निदर्शनाच्या या कार्यक्रमाला ठाणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दुष्काळग्रस्तांसाठी ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे मदत फेरी

, , ,

दि. २४ मार्च-२०१३ रोजी ठाणे शहरात, सकाळी ९:०० वा.पासून ते दुपारी १:०० वा.पासून आणि संध्याकाळी ४:०० वा.पासून ते सायंकाळी ७:०० वा.पर्यंत, ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे मदतफेरीचे आयोजन करण्यात आले असून, गहू-तांदुळ, ज्वारी-बाजरी, डाळ इ. धान्याच्या स्वरुपात आपण मदत करु शकता. “पैशाच्या स्वरुपात मदत स्वीकारली जाणार नाही, हे कृपया ध्यानात घ्यावे.” (नागरिकांनी पैशाच्या स्वरुपातील मदत, महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या मदतनिधी योजनांच्या माध्यमातून करावी.) “पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया… ‘थेंबे थेंबे तळे साचे’ असं नव्हे; तर, आता दुष्काळी समयी, ‘थेंबे थेंबे तळे वाचे’, असं म्हणावयास हवे !!!“
…यासाठी शहरवासीयांनी अंघोळीसाठी, सोसायटीमधील जिने धुण्यासाठी, बाग-बगिच्यांसाठी व गाड्या धुण्यासाठी कमीतकमी पाण्याचा वापर करावा, दुष्काळाच्या गांभीर्याबाबत सर्वांना जागरुक करावे व आपल्या दुष्काळी बंधू-भगिनींप्रति सहसंवेदना प्रकट करावी, असे नम्र आवाहनही ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे, आम्ही ठाणेकर नागरिकांना करीत आहोत !!!

मदतरुपानं जमा झालेल्या पाच प्रकारच्या धान्यांचं वाटप, तीव्र दुष्काळी भागात (उदा. समनगांव-जालना, कोल्हेवाडी-केज इ.) ‘आम आदमी पक्षा’च्या सौ. अंजली दमानिया, ठाण्यातील प्रख्यात समाजसेवक सर्वश्री नितीन देशपांडे व ‘धर्मराज्य पक्षा’चे संघटक तसेच, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सरचिटणीस श्री. विक्रांत कर्णिक यांच्या देखरेखीखाली केले जाईल, याची कृपया नोंद घ्या!

धर्मराज्य पक्ष स्थापना…

, ,

दि. १६ नोव्हेंबर २०११ रोजी आपल्या ‘धर्मराज्य पक्षा’ची स्थापना झाली.

बुधवार, दि.१६ नोव्हेंबर-२०११ रोजी ‘धर्मराज्य’ या नवीन राजकीय पक्षाची स्थापना व उदघाटन सोहळा ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्ष-राजन राजे, सरचिटणीस-राजू फणसे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. गोपाल दुखंडे, माजी न्यायमूर्ती/जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. बी.जी.कोळसेपाटील, ‘अर्थक्रांती’ प्रतिष्ठानचे अध्वर्यु श्री. यमाजी मालकर, पक्षाचे खजिनदार श्री. जयेंद्र जोग, सामाजिक कार्यकर्ते श्री. नितीन देशपांडे, शेतकरी संघटनेचे नेते श्री. रघुनाथदादा पाटील यांनी हुतात्म्यांच्या पुतळ्याजवळ दिप-प्रज्वलन व पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन केले.

उपस्थित मान्यवर आणि जनता जनार्दनाच्या साक्षीने पक्षाचा नामफलक, मुद्रा आणि झेंड्याचे अनावरण करून ‘धर्मराज्य पक्षा’ची मुहूर्तमेढ रोवली. नंतर ‘धर्मराज्य पक्षा’चे ब्रीद असलेली प्रतिज्ञा उद्धृत करण्यात आली. पक्षाचे सरचिटणीस श्री. राजू फणसे यांनी सुमारे ६५ कार्यकर्त्यांना नियुक्ती-पत्र देऊन त्यांच्या प्राथमिक नेमणूका झाल्याचे घोषित केले. नियुक्ती-पत्र मिळालेल्या सर्व पदाधिकार्यांना प्रा.गोपाल दुखंडे यांनी शपथ दिली. पक्षाच्या उदघाटन सोहळ्यामद्धे महापुरुषांचे पुतळे न ठेवता हुतात्म्यांचा पुतळा ठेवण्यामागील पक्षाची भूमिका सरचिटणीस राजू फणसे यांनी स्पष्ट केली व सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवण्यात येईल.

याबाबतचे विवेचन केले. प्रा.गोपाळ दुखंडे यांनी आपल्या भाषणात सध्याची राजकीय परिस्थिती, राजकीय पक्ष व त्यांचे नेते यावर कडक ताशेरे ओढले. तसेच धर्मराज्य पक्षाकडून जनतेची खूप अपेक्षा आहे असे सांगून पक्षाच्या वाटचालीला आशीर्वाद दिले.

१% राजकीय व आर्थिक शासकवर्गानं ९९% बहुसंख्यांकांवर लादलेलं ‘पारतंत्र्य’… लादलेली गुलामगिरी मोडून काढून खऱ्याखुऱ्या ‘सामाजिक लोकशाही’तल्या कल्याणकारी स्वातंत्र्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर राजकीय संस्कृतिची नव्यानं उभारणी करणाऱ्या एका जाज्वल्य राजकीय पक्षाची स्थापना होणं… नव्या सकस-जातिवंत राजकीय रोपटयाच रोपण होणं, ही काळाची गरज बनली होत़ी !

‘जशी उक्ति तशी कृती’ या न्यायाने ‘धर्मराज्य पक्ष’ चालणार असून त्याच्या नावातच सारंरूपाने तो नैसर्गिक तत्वाच्या मुल्यांवर आधारीत असा पक्ष आहे. पक्षाच्या ध्वजाच्या रंगांमधील लाल रंग हा क्रांतीदर्शी, तर पांढरा रंग हा सप्तरंगांनी बनलेला म्हणून सर्वसमावेशक व उर्जावान, हिरवा रंग निसर्गाशी तादात्म्य दाखविणारा तर निळा रंग हा महासागराची व आभाळाची विशालता व गांभीर्य दाखविणारा तर भगवा रंग हा चैतन्याशी व आध्यात्म्याशी निगडीत असणारा आहे. झेंडयाच्या मध्यभागी असणारे भगव्या रंगाचे चक्र हे श्रीकृष्णाच्या सुदर्शनचक्राचे प्रतिक असून ‘धर्मराज्य पक्षा’चा तात्विक पाया (धार्मिक नव्हे!) हा युगंधर श्रीकृष्णाच्या कळीकाळाला व्यापून उरणाऱ्या तत्वज्ञानावर आधारलेला आहे, हे दर्शविते. कुठल्याही राज्यव्यवस्थेचं, मानवी आकांक्षांचा सन्मान राखणं हे मुख्य काम असतं. गेले शतकभर भांडवलशाहीविरुद्ध साम्यवाद (कम्युनिझम्) हा सामान्य माणसाच्या हितरक्षणासाठी स्वीकारलेल्या दोन विचार-प्रणालींचा संघर्ष चालू आहे. सामान्य माणूस संपला – उध्वस्त झाला. हा संघर्ष आजही संपलेला नाही. म्हणून जणू मानवी मर्कटलिलांवर संतप्त होत निसर्गाने आपला तिसरा डोळा उघडून येत्या काही दशकात हा संघर्ष मिटवायला घेतल्याची दु:चिन्हे आहेत. मानव जातीपुढे जागतिक तापमान वाढ, जैविक बहुविधतेचा ऱ्हास व रासायनिक प्रदूषण अशी महाभयंकर पर्यावरणीय संकटे उभी ठाकलेली आहेत. टोकाचे मानवी शोषण व निसर्गाचे शोषण याबाबत दुरदर्शीपणे ठाम व कठोर भूमिका घेण्याची तयारी व राजकीय इच्छाशक्ती भारतातील राजकीय पक्ष दाखवत नसल्याने हि जबाबदारी ‘धर्मराज्य पक्ष’ स्वीकारीत आहे.

अण्णा हजारेंच्या ‘जनलोकपाल’ विधेयकाला आणि श्री अनिल बोकिलांच्या ‘अर्थक्रांती’ संकल्पनेला पूर्ण पाठींबा, औद्योगिक सेवाक्षेत्रातील अस्पृश्यता व गुलामगिरी बनलेल्या मजूर-कंत्राटदारी पद्धतीचं समुळ उच्चाटन व विध्वंसक अणूऊर्जेला विरोध तसेच शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांमधील बेलगाम खाजगी करणाला तीव्र विरोध हे आमचे प्रमुख मुद्दे आहेत.परिपूर्ण संघराज्यीय पद्धतीनुसार ‘राष्ट्रांतर्गत राष्ट्र…. महाराष्ट्र’ या तत्वावर सर्वच राज्यांना जास्तीत जास्त स्वायतत्ता देण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी असेल.

error: Content is protected !!