महिना: एफ वाय

धर्मराज्य पक्षा’च्यावतीने रायगड जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप व विकास कामांचे उद्घाटन

‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने पोलादपूर (रायगड जिल्हा) तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या बोरघर गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नुकतेच पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन ‘धर्मराज्य पक्षा’चे महाड-पोलादपूर विधानसभा अध्यक्ष संभाजी पार्टे यांनी केले होते.
यावेळी बोरघर गावप्रमुख दगडूबुवा पार्टे, केंद्रप्रमुख श्री. कासारे सर, मुख्याध्यापक श्री. धहीवडे सर, ‘धर्मराज्य पक्षा’चे लोकमान्य नगर-४ (ठाणे) चे प्रभाग अध्यक्ष समीर गोलतकर तसेच पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोरघर ग्रामपंचायतीमधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. दरम्यान गोवेले ग्रामपंचायतीचे सरपंच किसन मोरे यांच्या हस्ते गोवेले येथे पेव्हर ब्लॉकचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी ‘धर्मराज्य शेतकरी संघटने’चे महाड-पोलादपूर विधानसभा उपाध्यक्ष भगवान साळवी, ग्रामसेवक, समस्त ग्रामस्थ आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संविधान मोर्चातून जनतेचा हुंकार; राजन राजे म्हणाले – पर्यावरण, कामगार आणि पाण्याच्या लढ्याला ‘धर्मराज्य पक्ष’ साथ देणार

“महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या, कंत्राटी कामगारांच्या तसेच पर्यावरणाच्या मुद्यावर डॉ. सुरेश माने यांनी लढा उभारल्यास ‘धर्मराज्य पक्ष’ अखेरपर्यंत त्यांच्या सोबत असेल” असे स्पष्ट प्रतिपादन पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी आपल्या भाषणात ठामपणे केले. “आज राज्यभरात समाधानकारक पाऊस पडत असला तरी, अजूनही मराठवाडा आणि विदर्भातील बहुसंख्य गावे व शहरे तहानलेलीच आहेत आणि हे फक्त राज्य शासनानेच पाप आहे.” असा थेट आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला. ‘धर्मराज्य पक्ष’ कधीही जात-धर्म मानत नाही, असे विधान करुन राजन राजे पुढे म्हणाले, “माणसाला गुलामगिरीत वाजवणारे प्रस्थापित हे आमच्यासाठी देशद्रोही आणि धर्मद्रोहीच आहेत.” या ‘संविधान मोर्चा’ला ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे, नवी मुंबई, कामोठे (रायगड) येथील सर्व पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २७ जुलै रोजी पार पडलेला जिजामाता उद्यान (भायखळा) ते आझाद मैदानापर्यंतचा “संविधान मोर्चा” प्रचंड यशस्वी ठरला. जनसामान्यांना भेडसावणा-या प्रश्नांचा राज्य आणि केंद्र सरकारला जाब विचारणा-या या प्रचंड मोर्चाचे नेतृत्व ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे, ‘बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी’चे अध्यक्ष डॉ. सुरेश माने आणि ‘शिवराज्य पक्षा’चे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले.

महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी ‘धर्मराज्य पक्ष’ मैदानात; ठाणे स्टेशनबाहेर स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय लोकल ट्रेन्समध्ये महिलांसाठी राखीव असणा-या डब्यांची संख्या अपुरी असून, ती वाढवावी तसेच गर्दीच्या वेळेत कल्याण आणि डोंबिवलीप्रमाणे ठाणे ते सीएसटी ‘महिला विशेष’ लोकल सुरु करावी या प्रमुख मागण्यांसाठी, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य प्रवासी संघटने’च्यावतीने गुरुवार, दि. २१ जुलै रोजी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर नोकरदार महिलांच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती.
यावेळी महिला प्रवाशांबरोबरच पुरुष प्रवाशांनीदेखील या मोहिमेस उदंड प्रतिसाद दिला. ‘धर्मराज्य पक्षा’च्या ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा जयश्री पंडित यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या स्वाक्षरी मोहिमेत तब्बल ९५० महिला व पुरुष ठाणेकर चाकरमान्यांनी स्वाक्षरी करुन, आपला सहभाग तसेच पाठिंबा नोंदवला.
स्वाक्षरी मोहिमेच्या या कार्यक्रमात ‘धर्मराज्य महिला संघटने’च्या महाराष्ट्र राज्य सचिव स्वप्नाली पवार, शिक्षक संघटनेच्या महासचिव साक्षी शिंदे, पक्षाच्या ठाणे महिला सचिव दर्शना पाटील, कोपरी विभाग महिला अध्यक्षा भारती सावंत, प्रतिभा टपाल, कमल बागुल, मनीषा सांडभोर, मयुरी वायदंडे आदी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत, ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंडाळकर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश कराळे, शिक्षक संघटनेचे सचिव प्रा.भरत जाधव, पक्षाचे खोपट विभाग अध्यक्ष सुनील घाणेकर, कोलबाड विभाग अध्यक्ष राजू शिंदे, नौपाडा विभाग अध्यक्ष दिनेश चिकणे, कोपरी-आनंदनगर प्रभाग अध्यक्ष नितीन वायदंडे,
लोकमान्य नगर प्रभाग अध्यक्ष महेश क्षीरसागर, चेंदणी-कोळीवाडा प्रभाग अध्यक्ष आनंद कोळी, नितीन उगले, रॉजर सायमन, संदीप सोनखेडे, विपुल कदम, महेश उतेकर, प्रकाश पवार, अश्वदीप भालेराव, सुधन सावंत, विलास दाभोळकर, सचिन निकम, प्रकाश डोंगरे, राजू सांडभोर, सुनील सांडभोर,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल जयश्री पंडित यांनी ‘धर्मराज्य पक्षा’च्या सर्व मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस महिला विशेष लोकल सुरू करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’ची स्वाक्षरी मोहीम

, , , ,

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल गाड्यांमधली गर्दी दिवसेंदिवस वाढत जात असून, त्यात महिला नोकरदार वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या अस्तित्वात असलेल्या उपनगरीय लोकल गाड्यांमधले महिलांसाठी राखीव असलेले डबे अपुरे असून, त्यांची संख्या आणखी दोन डब्यांनी वाढवावी तसेच कल्याण आणि डोंबिवलीप्रमाणे ठाणे रेल्वे स्थानकातून ‘ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस’ अशी महिला विशेष लोकल गाडी गर्दीच्या वेळेस सुरु करावी या मागणीसाठी ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य महिला संघटना’ आणि ‘धर्मराज्य प्रवासी संघटना’ यांच्यामार्फत २० आणि २१ जुलै या दोन दिवशी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती. याला ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रवासात महिलांच्या अपघातांची संख्या वाढली असून, ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि महिला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून गंभीर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून महिलांच्या डब्यांची संख्या जैसे थे अशी आहे मात्र, महिला नोकरदारवर्गाची संख्या प्रचंड वाढलेली आहे. याचा संपूर्ण ताण हा महिलांना प्रवास करताना सोसावा लागत आहे. शिक्षणात आणि नोकरीमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण असले तरी, उपनगरीय रेल्वे लोकलच्या माध्यमातून सातत्याने घडत असलेल्या अपघातांपासून महिलांना संरक्षण कधी मिळणार ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधक आणि मध्य रेल्वेचे मुख्य प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले आहे.

दि. २० आणि २१ जुलै या दोन दिवशी ‘धर्मराज्य प्रवासी संघटने’च्यावतीने ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही ठिकाणी प्रवाशांमार्फत स्वाक्षरी मोहीम राबवली होती. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला असून, उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांची संख्या वाढवावी तसेच ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी महिला विशेष लोकल गाडी गर्दीच्या वेळेत सुरु करावी, अशी मागणी या स्वाक्षरी मोहीमेच्यावेळी करण्यात आली. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा अध्यक्षा जयश्री पंडित, सहसचिव दर्शना पाटील ठाणे लोकसभा उपाध्यक्ष नरेंद्र पंडित, बेलापूर विधानसभा अध्यक्ष निवास साळुंखे, धर्मराज्य शिक्षक-शिक्षकेतर संघटनेच्या महासचिव साक्षी शिंदे, सचिव भरत जाधव, नवी मुंबई शहर महिला अध्यक्षा शितल कोळी, उपाध्यक्षा रेखा साळुंखे, पोर्णिमा सातपुते, उज्ज्वला जाधव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!