भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर, सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात, मनुवादी विचारसरणीच्या वकिलाकडून झालेल्या बूटफेकीच्या भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ, ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरातील, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ, ‘संविधानप्रिय समता-मूलक समाज’ आणि आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांकडून गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर-२०२५ रोजी, आंदोलन पुकारण्यात आले होते. या निषेध आंदोलनात ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव श्री. नरेंद्र पंडित, पक्षाचे प्रवक्ते तथा ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सचिव श्री. समीर चव्हाण, ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रसिद्धीप्रमुख श्री. संजय दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मनुवादी मानसिकता तसेच, जातीयवादी कृत्ये करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या, प्रस्थापित ब्राह्मणी व राजकीय व्यवस्थेचा जाहीर निषेध करण्यात आला. “भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, यांसारख्या जात्यंध आणि धर्मांध शक्तींविरोधात, देशातील बहुजन समाजाने एकत्र येऊन प्राणपणाने लढा दिल्याशिवाय, अशा प्रवृत्ती नष्ट होणार नाहीत. त्यासाठी, सामाजिक-राजकीय-जातीय मतभेद विस

रुन, लोकशाही व सनदशीरमार्गानेच संविधानाचे रक्षण करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे!” असे विधान ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव श्री. नरेंद्र पंडित यांनी, प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले. दरम्यान, याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष श्री. नानासाहेब इंदिसे, श्री. जितेंद्रकुमार इंदिसे, श्री. भैय्यासाहेब इंदिसे, श्री. संदीप खांबे, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. संजय मं.गो., श्री. पंढरीनाथ गायकवाड, श्री. भास्कर वाघमारे, श्री. प्रमोद इंगळे, श्री. संजय भालेराव आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.