कॅटेगरी: मोर्चा

‘धर्मराज्य पक्ष’तर्फे ठाण्यात ‘४ काळ्या कामगार-संहितां’विरोधात भव्य आक्रोश मोर्चा; मान्यवरांची उपस्थिती

आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त ‘धर्मराज्य पक्ष’ व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ यांच्या वतीने ठाण्यात ‘राष्ट्रीय संपत्ती-निर्मात्या’ कामगारांचा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सायं. ४.३० वाजता सुरू झालेल्या या मोर्चात विविध औद्योगिक क्षेत्रांतील कामगार, कर्मचारी, पदाधिकारी व ठाणेकर जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
केंद्र सरकारने लागू केलेल्या ‘४ काळ्या कामगार-संहितां’विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या संहितांमुळे कामगारांचे मूलभूत हक्क धोक्यात येऊन शोषण, असुरक्षितता व कंत्राटीकरण वाढणार असल्याची वस्तुस्थितीवर यावेळी जनतेसमोर मांडण्यात आली. कामगार संघटनांची ताकद कमी करणे, नोकरीतील स्थैर्य नष्ट करुन ‘‘Hire & Fire’’ धोरणाला चालना देणे, अशा विविध मुद्द्यांवर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
मोर्चादरम्यान कामगारांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्या प्रखरपमे मांडल्या. ‘४ कामगार संहितां’ची तत्काळ रद्दबातल करावी, कामगारांचे हक्क अबाधित ठेवावेत; तसेच, कंत्राटी-कामगार पद्धतीचं निर्मूलन करावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या मोर्चात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली, त्यामध्ये ॲड. विजय कुर्ले, ॲड. नाना अहिरे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष (ग्रामीण) चेतनसिंह पवार, काँग्रेस ठाणे जिल्हा पदाधिकारी राहुल पिंगळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ नेत्या वंदनाताई शिंदे व कॉ. उदय चौधरी, आनंदा होवाळ यांचा समावेश होता.
त्याचप्रमाणे या मोर्चात धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघ महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण, धर्मराज्य पक्षाचे सचिव नरेंद्र पंडित, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष सचिन शेट्टी, पोर्णिमा सातपुते, जगन्नाथ सलगर आदी पदाधिकारी व इतर कार्यकर्ते तसेच कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी कामगारांच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करत, ‘४ काळ्या कामगार-संहितां’मुळे जसा आपत्कालीन अवस्थेत विमानाचा वैमानिक, ‘मे डे’ (May Day) असा वाचविण्यासाठी संदेश (SOS) पाठवतो; तशीच अवस्था ‘कामगारां’ची झालीय…पण, लक्षात कोण घेतो? कामगार-चळवळ संपवून कामगारांना कंत्राटी-कामगार किंवा ‘मुदतबंद-कामगार’ (FTE…Fixed Term Employee) या नात्याने ‘गुलाम’ बनवणं सुरु आहे…
म्हणूनच यासारखे लढे, कामगारांच्या हक्कांसाठी निर्णायक ठरणार असल्याने, महाराष्ट्रातील सर्व कामगारांनी ‘धर्मराज्य पक्षा’च्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला व भविष्यातही या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धर्मराज्य पक्षाने दिला आहे.

तिसऱ्या भाषेच्या लबाडीविरोधात एल्गार – ‘मराठीकारण’ासाठी आझाद मैदानात हुंकार!

प्राथमिक अभ्यासक्रमात तिसरी भाषा म्हणून, हिंदीभाषा सक्तीचा समावेश जरी, राज्य शासनाने तूर्तास रद्द केला असला तरी, सरकारची ही शासकीय लबाडी असून, “लबाडी अजून थांबलेली नाही, तर लढाई कशी थांबेल?” या घोषणेखाली, ‘शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती’चे आयोजक प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि. ७ जुलै-२०२५ रोजी, मुंबईच्या आझाद मैदानात एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे, पक्षाचे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, काँग्रेसचे रोजगार विभाग प्रदेश संयोजक श्री. धनंजय शिंदे आणि ठाण्यातील मराठीप्रेमी वकील श्री. रशिकांत थोरवे आदी मान्यवरांसह, श्री. अविनाश सावंत, श्री. सुमित कदम, श्री. निलेश सावंत हे ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पाचवीपर्यंत कोणतीही तिसरी भाषा नको, डॉ. नरेंद्र जाधव समिती तत्काळ रद्द करण्यात यावी, बालभारतीची शैक्षणिक स्वायत्तता अबाधित ठेवण्यात यावी, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि SCERT संचालक राहुल रेखावार यांची हकालपट्टी करण्यात यावी, १५ मार्च २०२४चे नवीन संचमान्यता धोरण रद्द करावे, या मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी प्रा. डॉ. दीपक पवार आणि मा. राजन राजे यांच्यात महाराष्ट्रात शिक्षणाचे ‘मराठीकारण’ व मराठी भाषेच्या संरक्षण-संवर्धन चळवळीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.

लक्ष्मीनारायण यांच्या बदलीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’चा निषेध मोर्चा आणि निदर्शने

, , ,

ठाण्याचे मावळते सह-पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या बदलीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’ने शुक्रवारी एका निशेध मोर्चाचे आयोजन केले होते. प्रामाणिक आणि कर्तव्यकठोर अशी ओळख असलेले लक्ष्मीनारायण यांनी आपल्या कार्यकाळात ठाण्यातील समाजकंटकांवर व भ्रष्ट राजकारण्यांवर चांगलाच वचक ठेवला होता. सूरज परमार आत्महत्या प्रकरणाचा तपासदेखील त्यांच्याच देखरेखीखाली सुरू असल्याने, परमारप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी नगरसेवकांचा पाय अधिकाधिक खोलात गेला होता. यामुळे लक्ष्मीनारायण हे सत्ताधारी आणि विरोधकांचा मुख्य अडसर ठरू पाहात होते. म्हणूनच राजकीय दबावापोटी बढतीच्या नावाखाली मुंबईतील पोलिस मुख्यालयात (अडगळीच्या ठिकाणी) अतिरिक्त महासंचालक (प्रशासन) पदी बदली करून, महाराष्ट्र शासनाने एका कर्तबगार ‘अॅक्शनबाज’ अधिका-याला ‘अॅक्शनबाद’;”kick up & kick out” केल्याच्या निशेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’ने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक निशेध मोर्चा काढला होता.

दरम्यान, चंदनवाडीतील रायगड गल्ली येथून सुरू झालेला हा निशेध मोर्चा ठाणे महापालिकेवरून गोखले रोड मार्गे नौपाडा परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे षेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित होते. बांधकाम व्यवसायिक सूरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांना मानसिक त्रास देणा-या ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवकांची नावे नोंद केली होती. त्यानंतर ठामपातील चार नगरसेवकांना अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास लक्ष्मीनारायण यांच्याकडे असल्याने, ठाण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली होती. शेवटी राजकीय दबावाचा वापर झाल्याने महाराश्ट्र शासनाने बढतीच्या बहाण्याने ठाणेकर नागरिकांचे आधारस्तंभ ठरलेल्या व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांची उचलबांगडी करीत मुंबईतील पोलिस मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक (प्रषासन) म्हणून बदली केली आणि परमार आत्महत्येप्रकरणाचा गतिमान झालेला तपास संथ करण्याचे महापाप केले.

व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे ठाणेकरांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त होत असतानाच ‘धर्मराज्य पक्षा’ने १२,१३,१४ जानेवारी या तीन दिवसात ठाण्याच्या विविध भागात स्वाक्षरी मोहिम राबवून लक्ष्मीनारायण यांच्या बदलीला विरोध दर्षविला. हजारो ठाणेकरांनीदेखील या बदलीचा निषेध करून स्वाक्षरी मोहीमेला उदंड प्रतिसाद दिला. या दरम्यान, ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांना पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन, लक्ष्मीनारायण यांच्या राजकीय हस्तक्षेपातून झालेल्या बदलीचा निशेध केला. ‘धर्मराज्य पक्षा’च्या मोर्चाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर ठाणे रेल्वे

स्थानक परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांची बदली म्हणजे निव्वळ राजकीय हेतूने झालेली असून, ठाण्यातील सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूच्या राजकारण्यांची मिलीभगत असल्याचा थेट आरोप पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी प्रसिध्दीमाध्यमांषी बोलतांना केला. एका ‘अॅक्शनबाज’ अधिका-याल ‘अॅक्शनबाद’ करून भारतीय जनता पक्ष राश्ट्रवादी काॅंगे्रसला आपल्या दबावाखाली आणत असल्याचे विधान त्यांनी यावेळी बोलतांना केले. सज्जनतेचा आव आणून ‘‘लक्ष्मीनारायण’’ यांची बदली रद्द करण्यासाठी, स्वपक्षीय मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचे ‘नाटक’ करणा-या, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी या बदलीप्रकरणी, आमदारकीचा ‘राजीनामा’ देवून आपल्या प्रामाणिकतेचा प्रत्यय द्यावा… अन्यथा, ठाणेकरांना उल्लू बनवू पाहणारी आपली राजकीय-नौटंकी बंद करावी, असे आव्हान दिले.

टीव्ही 9 वर झालेल्या एका परिसंवादाचा उल्लेख करत, ‘‘राम कदम नावाचा एक राजकीय दलाल, यावेळी लक्ष्मीनारायण यांच्या बदलीचे समर्थन करीत होता’’. या अशाच प्रवृत्तीमुळे देशात, महाराश्ट्रात राजकारण बदनाम झालयं. आम्हाला फक्त पाच किंवा दहा चांगले राजकारणी दाखवा, आम्ही ‘धर्मराज्य पक्षा’चे राजकारण बंद करून टाकतो’’, असे रोखठोक विधान करून, आमचे आजचे आंदोलन हे व्यक्तिसापेक्ष नसून, नीतिभ्रष्ट प्रवृत्तीविरूध्द असल्याचे पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी आपल्या भाषणात स्पश्ट केले.

याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव राम कोंढाळकर, उपाध्यक्ष राजू सावंत, अण्णा साळुंखे, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सदस्य मधुकर पवार, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, सचिव विनोद मोरे, उपाध्यक्ष नरेंद्र पंडित, सचिन शेट्टी, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ सलगर, सचिव चंदू येरूणकर, सहसचिव विजय भोसले, दिनेश चिकणे, माहिती अधिकार ठाणे शहर कक्षप्रमुख अनिल महाडिक, धर्मराज्य महिला संघटनेच्या अध्यक्षा जयश्री पंडित, सचिव साक्षी शिंदे, सहसचिव दर्शना पाटील, सदस्या वैशाली भवालकर, पौर्णिमा सातपुते, उज्वला जाधव, सोनम तारकर, मिनल मल्या, नवीमुंबई शहर अध्यक्षा शितल कोळी, उपाध्यक्षा रेखा साळुंखे, शिक्षक संघटनेचे सहसचिव प्रा. भरत जाधव, प्रभाग अध्यक्ष महेश क्षिरसागर, बेलापूर विधानसभा अध्यक्ष निवास साळुंखे, कामोठ्याचे सुमित गोवारी, सागर म्हात्रे, ऐरोली विधानसभा अध्यक्ष पांडूरंग गोरे, सचिव सिध्देश सावंत, युवा अध्यक्ष संतोष काजारे, भिवंडी लोकसभा अध्यक्ष भरत हलपतराव, मुरबाड विधानसभा अध्यक्ष नरेश रसाळ आदी मान्यवर तसेच, इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!