कॅटेगरी: आंदोलन

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठरावाचा धर्मराज्य पक्षाचा ऐरोलीत निषेध मोर्चा

नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कार्यशैलीबाबत राजकीय आकस बाळगून, नवी मुंबईतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडल्याच्या निषेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने सोमवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी ऐरोली विधानसभा क्षेत्रात एका निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, सल्लागार आणि ज्येष्ठ विचारवंत आनंदा होवाळ, बेलापूर विधानसभा अध्यक्ष निवास साळुंखे, ऐरोली विधानसभा अध्यक्ष पांडुरंग गोरे, उपाध्यक्ष विजय नांदूरकर, सचिव सिद्धेश सावंत, सह-सचिव रत्नदीप कांबळे, ओवळा-माजिवडा विधानसभा अध्यक्ष प्रा. भरत जाधव, कोकण समन्वयक नरेंद्र शिंदे आणि नवी मुंबई महिला अध्यक्षा शीतल कोळी, युवा कार्यकर्ता संदीप सोनखेडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

खड्डयांच्या निषेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने ठा.म.प मुख्यालयवर ‘हेल्मेट मोर्चा…!

ठाण्यातील खड्डयांबाबत अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी ‘धर्मराज्य पक्षा’ला दिले दुरुस्तीचे आश्वासन…!
ठाणे शहरातील पडलेल्या खड्डयांबाबत महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने शुक्रवार, दि. २६ ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या अभिनव पद्धतीच्या ‘हेल्मेट मोर्चा’ला ठाणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पक्षाच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान करुन चिंतामणी चौक ते ठाणे महापालिका मुख्यालयावर हातात ठाण्यातील खड्डयांचे छायाचित्र असलेले फलक घेऊन धडक मारली. ठाण्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यामाध्यमातून होणा-या अपघातांना महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’कडून करण्यात आला. शहरातील नवीन व जुन्या रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट करणे, रस्त्यांची निकृष्ठ दर्जाची कामे करणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून, त्यांच्यावर दंडात्मक करणे, सर्व्हिस रस्त्यावर असलेल्या गॅरेज आणि जुन्या मोटारी विकणा-यांवर कायदेशीर कारवाई करुन, ठाण्यातील सर्व रस्ते तसेच पदपथ मोकळे करणे अशा मागण्या आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी गणेशोत्सवापूर्वी ठाण्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्व्हिस रस्त्यावर असलेले अनधिकृत गॅरेज आणि जुन्या गाड्यांची विक्री करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पक्षाच्या पदाधिका-यां समोर मान्य केले.
दरम्यान याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष सचिन शेट्टी, महेशसिंग ठाकूर, ओवळा-माजिवडा विधानसभा अध्यक्ष प्रा. भरत जाधव, भिवंडी लोकसभा अध्यक्ष भरत हलपतराव, महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा सह-सचिव दर्शना पाटील, सदस्या उज्ज्वला जाधव या महिला आणि पुरुष पदाधिका-यांसोबत ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणेकर नागरिकांनी विशेषतः दुचाकीधारकांनी या अभिनव ‘हेल्मेट मोर्चा’बद्दल समाधान व्यक्त करुन, पक्षाच्या या उपक्रमाबाबत आभार मानले.

संविधान मोर्चातून जनतेचा हुंकार; राजन राजे म्हणाले – पर्यावरण, कामगार आणि पाण्याच्या लढ्याला ‘धर्मराज्य पक्ष’ साथ देणार

“महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या, कंत्राटी कामगारांच्या तसेच पर्यावरणाच्या मुद्यावर डॉ. सुरेश माने यांनी लढा उभारल्यास ‘धर्मराज्य पक्ष’ अखेरपर्यंत त्यांच्या सोबत असेल” असे स्पष्ट प्रतिपादन पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी आपल्या भाषणात ठामपणे केले. “आज राज्यभरात समाधानकारक पाऊस पडत असला तरी, अजूनही मराठवाडा आणि विदर्भातील बहुसंख्य गावे व शहरे तहानलेलीच आहेत आणि हे फक्त राज्य शासनानेच पाप आहे.” असा थेट आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला. ‘धर्मराज्य पक्ष’ कधीही जात-धर्म मानत नाही, असे विधान करुन राजन राजे पुढे म्हणाले, “माणसाला गुलामगिरीत वाजवणारे प्रस्थापित हे आमच्यासाठी देशद्रोही आणि धर्मद्रोहीच आहेत.” या ‘संविधान मोर्चा’ला ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे, नवी मुंबई, कामोठे (रायगड) येथील सर्व पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २७ जुलै रोजी पार पडलेला जिजामाता उद्यान (भायखळा) ते आझाद मैदानापर्यंतचा “संविधान मोर्चा” प्रचंड यशस्वी ठरला. जनसामान्यांना भेडसावणा-या प्रश्नांचा राज्य आणि केंद्र सरकारला जाब विचारणा-या या प्रचंड मोर्चाचे नेतृत्व ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे, ‘बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी’चे अध्यक्ष डॉ. सुरेश माने आणि ‘शिवराज्य पक्षा’चे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले.

महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी ‘धर्मराज्य पक्ष’ मैदानात; ठाणे स्टेशनबाहेर स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय लोकल ट्रेन्समध्ये महिलांसाठी राखीव असणा-या डब्यांची संख्या अपुरी असून, ती वाढवावी तसेच गर्दीच्या वेळेत कल्याण आणि डोंबिवलीप्रमाणे ठाणे ते सीएसटी ‘महिला विशेष’ लोकल सुरु करावी या प्रमुख मागण्यांसाठी, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य प्रवासी संघटने’च्यावतीने गुरुवार, दि. २१ जुलै रोजी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर नोकरदार महिलांच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती.
यावेळी महिला प्रवाशांबरोबरच पुरुष प्रवाशांनीदेखील या मोहिमेस उदंड प्रतिसाद दिला. ‘धर्मराज्य पक्षा’च्या ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा जयश्री पंडित यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या स्वाक्षरी मोहिमेत तब्बल ९५० महिला व पुरुष ठाणेकर चाकरमान्यांनी स्वाक्षरी करुन, आपला सहभाग तसेच पाठिंबा नोंदवला.
स्वाक्षरी मोहिमेच्या या कार्यक्रमात ‘धर्मराज्य महिला संघटने’च्या महाराष्ट्र राज्य सचिव स्वप्नाली पवार, शिक्षक संघटनेच्या महासचिव साक्षी शिंदे, पक्षाच्या ठाणे महिला सचिव दर्शना पाटील, कोपरी विभाग महिला अध्यक्षा भारती सावंत, प्रतिभा टपाल, कमल बागुल, मनीषा सांडभोर, मयुरी वायदंडे आदी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत, ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंडाळकर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश कराळे, शिक्षक संघटनेचे सचिव प्रा.भरत जाधव, पक्षाचे खोपट विभाग अध्यक्ष सुनील घाणेकर, कोलबाड विभाग अध्यक्ष राजू शिंदे, नौपाडा विभाग अध्यक्ष दिनेश चिकणे, कोपरी-आनंदनगर प्रभाग अध्यक्ष नितीन वायदंडे,
लोकमान्य नगर प्रभाग अध्यक्ष महेश क्षीरसागर, चेंदणी-कोळीवाडा प्रभाग अध्यक्ष आनंद कोळी, नितीन उगले, रॉजर सायमन, संदीप सोनखेडे, विपुल कदम, महेश उतेकर, प्रकाश पवार, अश्वदीप भालेराव, सुधन सावंत, विलास दाभोळकर, सचिन निकम, प्रकाश डोंगरे, राजू सांडभोर, सुनील सांडभोर,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल जयश्री पंडित यांनी ‘धर्मराज्य पक्षा’च्या सर्व मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

ठामपातील बेसुमार वृक्षतोडीविरोधात `धर्मराज्य पक्षा’ ची निदर्शने

रस्तारूंदीकरण आणि शहरीकरणाच्या नावाखाली ठाणे महानगरपालिकेने सध्या शहरातील नौपाडा, वर्तकनगर आणि पोखरण रोडवरील डेरेदार वृक्ष निर्दयीपणे कापायला सुरूवात केली आहे. एकाअर्था, ठामपा पुरस्कृत निसर्ग आणि पर्यावरणाचा खून पाडण्याचं कार्य महापालिका प्रशासनानं हाती घेतलेलं असून, त्याचाच निषेध करण्यासाठी `धर्मराज्य पक्षा’च्यावतीने शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ `वसुंधरा दिना’च्या पार्श्वभूमीवर तीव्र निदर्शने करण्यात आली. ठाणे शहराला लाभलेला निसर्गाचा समृध्द वारसा यानिमित्ताने नष्ट होण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप यावेळी `धर्मराज्य पक्षा’ने ठाणे महापालिका प्रशासनावर केला आहे.
दरम्यान, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहर विकासाच्या आणि रस्तारूंदीकरणाच्या आड येणारी अनधिकृत बांधकामे तोडण्यास धुमधडाक्यात सुरूवात केली आहे. आयुक्तांच्या या धडाडीचे ठाणेकर नागरिकांनी कौतुक केले असले; तरी, बेसुमार वृक्षतोडीमुळे नागरिक नाराज झालेले आहेत. नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनी विभागात सध्या प्रस्तावित उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असून, त्यासाठी संपूर्ण महात्मा गांधी रस्त्यावरील झाडांच्या कत्तली झाल्या आहेत. मुळात याठिकाणी उड्डाणपूलाची आवश्यकता नसतांना तो उभारण्याचा घाट कुणाला खूष करण्यासाठी घातला जातोय? असा सवालदेखील `धर्मराज्य पक्षा’ने यावेळी उपस्थित केला आहे. याप्रसंगी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष सचिन शेट्टी, नरेंद्र पंडित, धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे महासचिव महेशसिंग ठाकूर, धर्मराज्य महिला संघटनेच्या समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा अध्यक्षा जयश्री पंडित, नवी मुंबई शहर उपाध्यक्षा रेखा साळूंखे, दर्शना पाटील, गिता पाटील, उज्ज्वला जाधव, पोर्णिमा सातपुते, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ सलगर, सहसचिव दिनेश चिकणे, प्रभाग क्र. ४७ चे प्रभाग अध्यक्ष समीर कालगुडे, प्रभाग क्र. 24 चे प्रभाग अध्यक्ष राजू शिंदे, डोंबिवली शहर अध्यक्ष जगदीश जाधव, ठाणे शहर माहिती अधिकार कक्ष प्रमुख अनिल महाडिक, बेलापूर विधानसभा अध्यक्ष निवास साळुंखे, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्ष प्रा. भरत जाधव, प्रकाश पवार, दिपक देशपांडे, युवा कार्यकर्ता संदीप सोनखेडे, अमित लिबे, मनोज बेर्डे, गंभीर आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

यवतमाळयेथील मुलींच्या लैंगिक शोषणाच्या निषेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’ची ठाण्यात तीव्र निदर्शने

ठाणे (प्रतिनिधी): यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीच्या ‘यवतमाळ पब्लिक स्कूल’मधील, अल्पवयीन विद्यार्थिनींचे शाळेतील शिक्षकांनीच लैंगिक शोषण केल्याची संतापजनक आणि घृणास्पद घटना घडलेली असल्याने, संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण असून, विद्यादानासारख्या पवित्र क्षेत्रात घडलेल्या या घटनेमुळे शिक्षकी पेशाला काळीमा फासला गेलाय. गेल्या काही

महिन्यात राज्यातील विविध ठिकाणी, अल्पवयीन विद्यार्थिनींचे शाळेच्या आवारात लैंगिक शोषण होण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे कि नाही याबाबतचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, या घृणास्पद घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी मंगळवारी ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर (पश्चिम), वाहतूक पोलीस चौकीशेजारील पदपथावर निदर्शने करण्यात आली. याप्रकरणी शिक्षण संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांना अटक केली असली तरी, बलात्कारी प्रवृत्तीला संरक्षण देणाऱ्या संपूर्ण दर्डा कुटुंबियांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली.

दरम्यान स्वतःच्याच शाळेतील १४ अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण हे फक्त शिक्षकी पेशालाच नव्हे, तर अवघ्या मानवजातीलाच काळीमा फासणारे दुष्कर्म असून, विजय दर्डा यांची ‘काँग्रेसी संस्कृती’ हीच का ? असा सवाल यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना उपस्थित केला. दुर्दैवाने गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील विविध भागातील शाळांमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. याचाच अर्थ राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक आता गुंडांबरोबर शिक्षण क्षेत्रातील नराधमांनादेखील राहिलेला नसल्याचा आरोप यावेळी राजेश गडकर यांनी केला. या घृणास्पद घटनेतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा ठोठवावी तसेच याप्रकरणी संपूर्ण दर्डा कुटुंबियांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने आक्रमकपणे करण्यात आली. या निदर्शनावेळी ठाणे स्टेशन परिसरातील नागरीकांमार्फत स्वाक्षरी मोहीम राबवून घंटानाद करण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, ‘धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाचे महासचिव महेशसिंग ठाकूर, पक्षाचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष सचिन शेट्टी, नरेंद्र पंडित, मुरबाड विधानसभा अध्यक्ष भरत हलपतराव, ठाणे विधानसभा सचिव विजय भोसले, सह-सचिव चंद्रकांत येरुणकर, नौपाडा प्रभाग अध्यक्ष समीर कालगुडे, लोकमान्य नगर प्रभाग अध्यक्ष महेश क्षीरसागर, पाचपाखाडी प्रभाग अध्यक्ष अमित लीबे, ‘धर्मराज्य शिक्षक शिक्षकेतर संघटने’च्या महासचिव साक्षी शिंदे, पक्षाच्या महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा जयश्री पंडित, सचिव दर्शना पाटील,नवी मुंबई महिला अध्यक्षा शीतल कोळी, रुपेश पवार, दिनेश चिकणे, नितीन उगले आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. निदर्शनाच्या या कार्यक्रमाला ठाणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!