
भारतातील एकमेव पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी ओळख निर्माण झालेल्या ‘धर्मराज्य पक्षा’चा ५ वा वर्धापन दिन बुधवार, दि. १६ नोव्हेंबर ठाण्याच्या शिवाजी मैदानात उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
आगामी ठाणे आणि मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी प्रस्थापित भांडवलदारी राजकारण्यांवर शाब्दिक शरसंधान साधत त्यांच्यावर तोफ डागली.

वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमासाठी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार, झोपडपट्टी पुनर्वसन तसेच भाडेकरु कृती समितीचे मुंबई उपनगर अध्यक्ष कॉ. मदन नाईक, टोलविषयीचे अभ्यासक व टोलचा झोल उघड करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खराखुरा राजकीय इतिहास पुराव्यानिशी पटवून देणारे प्रख्यात शिवव्याख्याते किमंतु ओंबळे या मान्यवरांनी सहभागी होऊन आपले विचार मांडले. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे कोकण, विदर्भ-मराठवाड्यासहित राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.