“ऐतिहासिक कराराद्वारे नव-अस्पृश्यतारुपी कंत्राटी-कामगारपद्धत संपुष्टात……”
राजन राजेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा इतिहास रचला…!!!
एकीकडे नवी मुंबईतील दिघा येथील ‘सुल्झर पंप्स’ कंपनीतील कामगारांना ऐन गणेशोत्सवात दीड ते दोन लाखांच्या दरम्यान बोनस देऊन त्यांची दिवाळी साजरी झालेली असतानाच, नुकत्याच साजऱ्या झालेल्या दिवाळसणाच्या पहिल्याच दिवशी, अर्थात धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून नवी मुंबईस्थित महापे येथील ‘हिवा इंडिया’ कंपनीतदेखील भव्यदिव्य असा, तब्बल १२ हजार १०० रुपये पगारवाढीचा त्रैवार्षिक करार ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगारनेते मा. श्री. राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होऊन पुन्हा एकदा इतिहास रचला गेला. महत्वाची व उल्लेखनीय बाब म्हणजे, या ऐतिहासिक कराराद्वारे नव-अस्पृश्यतारुपी कंत्राटी-कामगारपद्धत संपुष्टात येऊन कंपनीतील एकूण ७२ कंत्राटी कामगार कायम झाले आहेत. या करारामुळे गेली अनेक वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या कामगारांना हक्काच्या कायमस्वरूपी नोकरीचा लाभ मिळून, त्यांना आर्थिक सुरक्षितता प्राप्त झाली आहे. या त्रैवार्षिक करारानुसार कामगारांना कमीतकमी ५० हजार, तर जास्तीतजास्त ६५ हजार इतकी दरमहा पगारवाढ झाली असून, बोनस म्हणून कमीतकमी ६० हजार, तर जास्तीतजास्त ८० हजार रुपयांची रक्कम सानुग्रह अनुदानासहित कामगारांना मिळणार आहे. या ऐतिहासिक करारामुळे ‘हिवा इंडिया’ कंपनीतील कामगारांमध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली अनेक वर्षे कंत्राटी नोकरीच्या गुलामगिरीत खितपत पडलेले कामगार आज खऱ्या अर्थाने ‘सुरक्षित’ झालेले असून, आम्हाला स्वाभिमानाचा मार्ग दाखविण्याचे श्रेय फक्त आणि फक्त मा. श्री. राजन राजे साहेबांनाच जाते, अशा शब्दांत कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, गेल्या ३६ वर्षांपासून कामगारक्षेत्रात कार्यरत असलेल्या राजन राजे यांनी, तीन दशकांहून अधिकच्या कार्यकाळात हजारो कामगारांना समृद्धीचा मार्ग दाखवलाय. कामगारांच्या न्याय्य-हक्कांसाठी व्यवस्थापनाशी आणि भांडवलदारी व्यवस्थेशी त्यांनी प्राणपणाने संघर्ष केलाय. गुलामगिरीचे प्रतीक असलेली कंत्राटीपद्धती ही कामगारक्षेत्रातील नव-अस्पृश्यता असल्यामुळे राजे यांनी सुरुवातीपासूनच या प्रथेविरुद्ध लढा उभारला व तो यशस्वीही करून दाखवला. ‘हिवा इंडिया’ कंपनीचा भव्यदिव्य त्रैवार्षिक करार हा उल्लेखनीय असला, तरी या कंपनीतील ७२ कंत्राटी-कामगार गुलामगिरीच्या विळख्यातून मुक्त झाले, हेच माझ्या आतापर्यंतच्या संघर्षाचं फलित असल्याची प्रतिक्रिया राजन राजे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. ऐन दिवाळीच्या निमित्ताने, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोमवार, दि. ५ नोव्हेंबर-२०१८ रोजी पार पडलेल्या या काराराप्रसंगी ‘हिवा इंडिया’ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आनंद गांगुली हेदेखील उपस्थित होते. यावेळी ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर आणि खजिनदार अण्णा साळुंखे या पदाधिकाऱ्यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या ऐतिहासिक करारान्वये १२ हजार १०० रुपयांची भरघोस पगारवाढ झाल्याने कामगारांचे वेतनमान उंचावले असून, याबाबत ‘हिवा इंडिया’च्या समस्त कामगारांनी ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष, तसेच ज्येष्ठ कामगारनेते राजन राजे जाहीर आभार व्यक्त करून एकच जल्लोष केला.



भारतातील एकमेव पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी ओळख निर्माण झालेल्या ‘धर्मराज्य पक्षा’चा ५ वा वर्धापन दिन बुधवार, दि. १६ नोव्हेंबर ठाण्याच्या शिवाजी मैदानात उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमासाठी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार, झोपडपट्टी पुनर्वसन तसेच भाडेकरु कृती समितीचे मुंबई उपनगर अध्यक्ष कॉ. मदन नाईक, टोलविषयीचे अभ्यासक व टोलचा झोल उघड करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खराखुरा राजकीय इतिहास पुराव्यानिशी पटवून देणारे प्रख्यात शिवव्याख्याते किमंतु ओंबळे या मान्यवरांनी सहभागी होऊन आपले विचार मांडले. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे कोकण, विदर्भ-मराठवाड्यासहित राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसिद्धीमाध्यमांची गळचेपी कशी केली जाते, हे ‘एन.डि.टी.व्ही. इंडिया’ या प्रख्यात वृत्तवाहिनीच्या एकदिवसीय बंदीप्रकरणावरून स्पष्ट झालेले असताना, याचाच निषेध करण्यासाठी, केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष आदरणीय राजन राजे यांच्या आदेशानुसार मंगळवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटिस पुलाखाली पक्षाच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.

ठाण्यातील खड्डयांबाबत अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी ‘धर्मराज्य पक्षा’ला दिले दुरुस्तीचे आश्वासन…!
दरम्यान याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष सचिन शेट्टी, महेशसिंग ठाकूर, ओवळा-माजिवडा विधानसभा अध्यक्ष प्रा. भरत जाधव, भिवंडी लोकसभा अध्यक्ष भरत हलपतराव, महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा सह-सचिव दर्शना पाटील, सदस्या उज्ज्वला जाधव या महिला आणि पुरुष पदाधिका-यांसोबत ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणेकर नागरिकांनी विशेषतः दुचाकीधारकांनी या अभिनव ‘हेल्मेट मोर्चा’बद्दल समाधान व्यक्त करुन, पक्षाच्या या उपक्रमाबाबत आभार मानले.
गटातटाच्या राजकारणाला बळी पडून आणि ग्रामसभेला राजकारणाचा अड्डा बनवून, सर्वसामान्य ग्रामस्थांचे हक्क डावलणा-या प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिका-यांच्या मनमानी कारभाराविरोधात शनिवार, दि. २० ऑगस्ट रोजी कामोठेवासीयांनी पुकारलेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कामोठे-जुई-नौपाडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे सुमारे १५० कार्यकर्ते या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले होते.
याप्रसंगी मावळ लोकसभा अध्यक्षा शोभना म्हात्रे, पनवेल विधानसभा अध्यक्ष गोपीनाथ भगत, उपाध्यक्ष संतोष गोवारी, सचिव भाऊ म्हात्रे, युवा अध्यक्ष सुमित गोवारी, युवा उपाध्यक्ष सागर म्हात्रे, युवा सचिव सचिन गोवारी, कामोठे शहर अध्यक्ष रत्नाकर गोवारी, उपशहर अध्यक्ष रमाकांत गोवारी, सचिव परशुराम म्हात्रे, कामोठे गाव अध्यक्ष गणेश नाईक, उपाध्यक्ष राजू म्हात्रे, सचिव महेंद्र म्हात्रे, जुई गाव अध्यक्ष चंद्रकांत चिमणे, उपाध्यक्ष अमृत कडू, सचिव स्वामी म्हात्रे, नौपाडा गाव अध्यक्ष बाबुराव भगत, उपाध्यक्ष प्रकाश भगत, सचिव रमेश भगत, सह-सचिव भगवान भगत आणि संपर्कप्रमुख पंढरीनाथ भगत आदी पदाधिका-यांसोबत ‘धर्मराज्य पक्षा’चे शेकडो कार्यकर्ते आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मु. काजिर्डे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथील जिल्हा परिषद शाळा क्र. १/२, अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांना पाटी-पेन्सिल आणि इतर शैक्षणिक साहित्याचे नुकताच वाटप करण्यात आले. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’च्या सरपंच सौ. अंजलीताई आमकर, सदस्या मिनाक्षी पांचाळ, ग्रामसेवक संजय दळवी, संतोष काजारे, नरेंद्र शिंदे, अमित आमकर आदी मान्यवरांसोबत गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘धर्मराज्य पक्ष’ आयोजित ५२वी भव्यदिव्य ‘महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा-२०१६’ या “न भूतो न भविष्यति” स्पर्धेचे सीकेपी हॉल, खारकर आळी, ठाणे (प) येथे शनिवार, दि. १३ ऑगस्ट रोजी दिमाखदार पद्धतीने उद्घाटन पार पडले. मंगळवार, दि. १६ ऑगस्टपर्यंत संपन्न होणा-या या कॅरम स्पर्धेत ठाणे-मुंबईसहित पुणे, नाशिक आणि कोल्हापूरयेथील नामवंत खेळाडूंनी भाग घेतला असल्याने, हि स्पर्धा पहिल्याच दिवसापासून चुरशीची बनली आहे.
याप्रसंगी, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, चेअरमन जितेंद्र शहा, उपाध्यक्ष परशुराम पाटील, मंजूर खान, शांताराम गोसावी, सह-सचिव जनार्दन संगम, राजेश रोडे, संतोष चव्हाण, ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष स्वप्नील किरकिरे, सचिव रवींद्र मोडक, खजिनदार अविनाश टिळक आणि ऑल इंडिया कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीपकुमार हजारीखा आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी ज्येष्ठ कॅरम खेळाडू रमेश चित्ती यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांच्या हस्ते त्यांच्या योगदानाबद्दल एक लाखाचा धनादेश देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशन यांनादेखील राजन राजे यांनी प्रत्येकी एक लाखाचा धनादेश निधी म्हणून सुपूर्द केला. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे सर्व पुरुष व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.