रविवार, दि. २६ जानेवारी-२०२५ रोजी, भारताच्या अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी, रात्री ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील अथवा इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेवून, ‘EVM’चा प्रतिकात्मक; पण, तीव्र निषेध व्यक्त करण्याचे विनम्र आवाहन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यावतीने करण्यात आले आहे…!!!”

रविवार, दि. २६ जानेवारी-२०२५ रोजी, भारताच्या अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी, रात्री ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील अथवा इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेवून, ‘EVM’चा प्रतिकात्मक; पण, तीव्र निषेध व्यक्त करण्याचे विनम्र आवाहन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यावतीने करण्यात आले आहे…!!!”
भाजप व त्यांची ‘महायुती’ (NDA) सत्तेवर आल्यानंतर, असं काही घडलं आणि घडत गेलं की, भारतीय जनतेचा ईव्हीएम (EVM) वरील विश्वास उडत गेला व आजमितीस तो पूर्णतया उडाल्यानेच, पुन्हा ‘कागदी-मतपत्रिकेवरील’ (Paper-Ballot) मतदानाची मागणी भारतभरातून व्हायला लागलीय…त्याच अनुरोधाने धर्मराज्य पक्ष, या “EVM हटाव… लोकतंत्र बचाव” मोहिमेत हिरिरीने उतरला असून, “आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम (EVM)’ऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात” यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, दि. १० डिसेंबर-२०२४च्या ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं औचित्य साधत निवडणूक-प्रक्रियेसंबंधाने (EVM हवं की, BALLOT-PAPER…???) अशी ठाणेकरांची ‘जनमत-चाचणी’ मोहीम सुरु करण्यात आलेली असून, त्याचाच भाग म्हणून बुधवार, दि. ११/१२/२०२४ रोजी…”EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी, कागदी-मतपत्रिकेद्वारे वर्तकनगर भागातील जनतेचं ‘सार्वमत’ संध्याकाळी ४ वा. पासून ते रात्रौ ८ वा. पर्यंत, वर्तकनगर नाका, (सह्याद्री मेडिकल स्टोअर्सजवळ) ठाणे (प) येथे घेण्यात आले.
तसेच, गुरुवार, दि.१२/१२/२०२४ रोजी संध्याकाळी ४ वा. पासून ते ८ वा.पर्यंत, ठाणे जनता सहकारी बँक, खोपट नाका, ठाणे (प) येथे मही जनमत-चाचणी घेण्यात येणार आहे.
यादरम्यान, २६ जानेवारी-२०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं निमित्त साधून ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या घरातले अथवा कार्यालयातले लाईट्स बंद ठेवून…‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहनदेखील ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने करण्यात आहे.
दि. ११ डिसेंबर-२०२४ रोजी, ठाण्यातील वर्तकनगर नाका येथे, पक्षाध्यक्ष मा. राजन राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत, ‘ईव्हीएम’विरोधी जनजागृती आंदोलन घेण्यात आले… यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव श्री. नरेंद्र पंडित, पक्षप्रवक्ते श्री. समीर चव्हाण, पक्षाचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष तसेच, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर यांच्यासह, ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते आणि कामगार सभासद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
No comments
Leave Your Comment

error: Content is protected !!