Day: July 27, 2016

संविधान मोर्चातून जनतेचा हुंकार; राजन राजे म्हणाले – पर्यावरण, कामगार आणि पाण्याच्या लढ्याला ‘धर्मराज्य पक्ष’ साथ देणार

“महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या, कंत्राटी कामगारांच्या तसेच पर्यावरणाच्या मुद्यावर डॉ. सुरेश माने यांनी लढा उभारल्यास ‘धर्मराज्य पक्ष’ अखेरपर्यंत त्यांच्या सोबत असेल” असे स्पष्ट प्रतिपादन पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी आपल्या भाषणात ठामपणे केले. “आज राज्यभरात समाधानकारक पाऊस पडत असला तरी, अजूनही मराठवाडा आणि विदर्भातील बहुसंख्य गावे व शहरे तहानलेलीच आहेत आणि हे फक्त राज्य शासनानेच पाप आहे.” असा थेट आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला. ‘धर्मराज्य पक्ष’ कधीही जात-धर्म मानत नाही, असे विधान करुन राजन राजे पुढे म्हणाले, “माणसाला गुलामगिरीत वाजवणारे प्रस्थापित हे आमच्यासाठी देशद्रोही आणि धर्मद्रोहीच आहेत.” या ‘संविधान मोर्चा’ला ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे, नवी मुंबई, कामोठे (रायगड) येथील सर्व पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २७ जुलै रोजी पार पडलेला जिजामाता उद्यान (भायखळा) ते आझाद मैदानापर्यंतचा “संविधान मोर्चा” प्रचंड यशस्वी ठरला. जनसामान्यांना भेडसावणा-या प्रश्नांचा राज्य आणि केंद्र सरकारला जाब विचारणा-या या प्रचंड मोर्चाचे नेतृत्व ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे, ‘बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी’चे अध्यक्ष डॉ. सुरेश माने आणि ‘शिवराज्य पक्षा’चे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले.
error: Content is protected !!