Month: August 2016

खड्डयांच्या निषेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने ठा.म.प मुख्यालयवर ‘हेल्मेट मोर्चा…!

ठाण्यातील खड्डयांबाबत अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी ‘धर्मराज्य पक्षा’ला दिले दुरुस्तीचे आश्वासन…!
ठाणे शहरातील पडलेल्या खड्डयांबाबत महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने शुक्रवार, दि. २६ ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या अभिनव पद्धतीच्या ‘हेल्मेट मोर्चा’ला ठाणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पक्षाच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी डोक्यावर हेल्मेट परिधान करुन चिंतामणी चौक ते ठाणे महापालिका मुख्यालयावर हातात ठाण्यातील खड्डयांचे छायाचित्र असलेले फलक घेऊन धडक मारली. ठाण्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यामाध्यमातून होणा-या अपघातांना महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’कडून करण्यात आला. शहरातील नवीन व जुन्या रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट करणे, रस्त्यांची निकृष्ठ दर्जाची कामे करणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून, त्यांच्यावर दंडात्मक करणे, सर्व्हिस रस्त्यावर असलेल्या गॅरेज आणि जुन्या मोटारी विकणा-यांवर कायदेशीर कारवाई करुन, ठाण्यातील सर्व रस्ते तसेच पदपथ मोकळे करणे अशा मागण्या आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी गणेशोत्सवापूर्वी ठाण्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्व्हिस रस्त्यावर असलेले अनधिकृत गॅरेज आणि जुन्या गाड्यांची विक्री करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पक्षाच्या पदाधिका-यां समोर मान्य केले.
दरम्यान याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष सचिन शेट्टी, महेशसिंग ठाकूर, ओवळा-माजिवडा विधानसभा अध्यक्ष प्रा. भरत जाधव, भिवंडी लोकसभा अध्यक्ष भरत हलपतराव, महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा सह-सचिव दर्शना पाटील, सदस्या उज्ज्वला जाधव या महिला आणि पुरुष पदाधिका-यांसोबत ‘धर्मराज्य पक्षा’चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणेकर नागरिकांनी विशेषतः दुचाकीधारकांनी या अभिनव ‘हेल्मेट मोर्चा’बद्दल समाधान व्यक्त करुन, पक्षाच्या या उपक्रमाबाबत आभार मानले.

कामोठे ग्रामस्थांच्या लाक्षणिक उपोषणाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांची उपस्थिती…!

गटातटाच्या राजकारणाला बळी पडून आणि ग्रामसभेला राजकारणाचा अड्डा बनवून, सर्वसामान्य ग्रामस्थांचे हक्क डावलणा-या प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिका-यांच्या मनमानी कारभाराविरोधात शनिवार, दि. २० ऑगस्ट रोजी कामोठेवासीयांनी पुकारलेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कामोठे-जुई-नौपाडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे सुमारे १५० कार्यकर्ते या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले होते.
यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. “प्रशासकीय व्यवस्थेत असलेल्या गुंडगिरीविरोधात लोकशाही मार्गानेच लढा दिला पाहिजे, त्यासाठी ‘धर्मराज्य पक्ष’ सदैव कामोठेवासीयांच्या पाठीशी राहील” अशा शब्दात राजन राजे यांनी आपला पाठिंबा दर्शवला.
याप्रसंगी मावळ लोकसभा अध्यक्षा शोभना म्हात्रे, पनवेल विधानसभा अध्यक्ष गोपीनाथ भगत, उपाध्यक्ष संतोष गोवारी, सचिव भाऊ म्हात्रे, युवा अध्यक्ष सुमित गोवारी, युवा उपाध्यक्ष सागर म्हात्रे, युवा सचिव सचिन गोवारी, कामोठे शहर अध्यक्ष रत्नाकर गोवारी, उपशहर अध्यक्ष रमाकांत गोवारी, सचिव परशुराम म्हात्रे, कामोठे गाव अध्यक्ष गणेश नाईक, उपाध्यक्ष राजू म्हात्रे, सचिव महेंद्र म्हात्रे, जुई गाव अध्यक्ष चंद्रकांत चिमणे, उपाध्यक्ष अमृत कडू, सचिव स्वामी म्हात्रे, नौपाडा गाव अध्यक्ष बाबुराव भगत, उपाध्यक्ष प्रकाश भगत, सचिव रमेश भगत, सह-सचिव भगवान भगत आणि संपर्कप्रमुख पंढरीनाथ भगत आदी पदाधिका-यांसोबत ‘धर्मराज्य पक्षा’चे शेकडो कार्यकर्ते आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने काजिर्डे येथे शालेय साहित्याचे वाटप…!

‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मु. काजिर्डे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथील जिल्हा परिषद शाळा क्र. १/२, अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांना पाटी-पेन्सिल आणि इतर शैक्षणिक साहित्याचे नुकताच वाटप करण्यात आले. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’च्या सरपंच सौ. अंजलीताई आमकर, सदस्या मिनाक्षी पांचाळ, ग्रामसेवक संजय दळवी, संतोष काजारे, नरेंद्र शिंदे, अमित आमकर आदी मान्यवरांसोबत गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धर्मराज्य पक्षाच्या ५२व्या भव्यदिव्य महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला ठाण्यात दिमाखदार सुरुवात

‘धर्मराज्य पक्ष’ आयोजित ५२वी भव्यदिव्य ‘महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा-२०१६’ या “न भूतो न भविष्यति” स्पर्धेचे सीकेपी हॉल, खारकर आळी, ठाणे (प) येथे शनिवार, दि. १३ ऑगस्ट रोजी दिमाखदार पद्धतीने उद्घाटन पार पडले. मंगळवार, दि. १६ ऑगस्टपर्यंत संपन्न होणा-या या कॅरम स्पर्धेत ठाणे-मुंबईसहित पुणे, नाशिक आणि कोल्हापूरयेथील नामवंत खेळाडूंनी भाग घेतला असल्याने, हि स्पर्धा पहिल्याच दिवसापासून चुरशीची बनली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्यदैवत शिवछत्रपतींच्या प्रतिमेस ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे (Rajan Raje) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन, स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी राजन राजे यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतानाच, आपल्या भाषणात पक्षाची राजकीय, पर्यावरणवादी आणि क्रीडाविषयक धोरणांबाबतची परखड मते मांडली.
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने ‘धर्मराज्य पक्ष’ आयोजित या भव्यदिव्य स्पर्धेसाठी एकूण ५ लाखांहून अधिक रोख परितोषिकांची बक्षिसे देण्यात येणार असून, पुरुष एकेरीसाठी १ लाख, महिला एकेरीसाठी ३० हजार, पुरुष ज्येष्ठ खेळाडू १० हजार, महिला ज्येष्ठ खेळाडू ५ हजार, पुरुष संघ (प्रथम) ३० हजार तर महिला संघ (प्रथम) १५ हजार अशा रोख रकमेचे वाटप करण्यात येणार आहे.
याप्रसंगी, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, चेअरमन जितेंद्र शहा, उपाध्यक्ष परशुराम पाटील, मंजूर खान, शांताराम गोसावी, सह-सचिव जनार्दन संगम, राजेश रोडे, संतोष चव्हाण, ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष स्वप्नील किरकिरे, सचिव रवींद्र मोडक, खजिनदार अविनाश टिळक आणि ऑल इंडिया कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीपकुमार हजारीखा आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी ज्येष्ठ कॅरम खेळाडू रमेश चित्ती यांचा ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांच्या हस्ते त्यांच्या योगदानाबद्दल एक लाखाचा धनादेश देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर, महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कॅरम असोसिएशन यांनादेखील राजन राजे यांनी प्रत्येकी एक लाखाचा धनादेश निधी म्हणून सुपूर्द केला. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे सर्व पुरुष व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

सावित्री नदी दुर्घटनेविरोधात धर्मराज्य पक्षाचा ठाण्यात लाक्षणिक उपोषण

महाडयेथील सावित्री नदीवरील दुर्घटनेसंदर्भात प्रस्थापित व मुजोर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि कोकणवासीयांच्या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या उपोषणाचे नेतृत्व ठाणे लोकसभा सचिव विनोद मोरे यांनी केले. महाडच्या दुर्घटनेनंतर ठाणे खाडीवर असलेला ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने, तो जोपर्यंत सुस्थितीत आणि सुरक्षित करण्यात येत नाही, तोपर्यंत कोपरी-आनंदनगर तसेच ऐरोली पुलाजवळील टोलवसुली बंद करण्यात यावी अशीही मागणी यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’कडून करण्यात आली.
याप्रसंगी राजन राजे यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. पक्षाच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, उपाध्यक्ष राजू सावंत, खजिनदार जयेंद्र जोग, ‘धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष सचिन शेट्टी, नरेंद्र पंडित, ठाणे विधानसभा सह-सचिव विजय भोसले, खोपट विभाग अध्यक्ष राजू शिंदे, कोपरी-आनंदनगर प्रभाग अध्यक्ष नितीन वायदंडे, संदीप सोनखेडे, नितीन उगले, रॉजर सायमन, गौरव गोरे, विकास मंडपे, सुहास बुगडे, प्रकाश डोंगरे, ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा जयश्री पंडित, महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, शिक्षक संघटनेच्या महासचिव साक्षी शिंदे, ठाणे लोकसभा महिला सचिव दर्शना पाटील आणि मयुरी वायदंडे आदी पुरुष आणि महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!