ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कोर्ट नाका, अशोक स्तंभ, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाच्या कार्यक्रमास धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यासह धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
स्वातंत्र्यलढ्यातील बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य आणि त्यानंतर भारतीय जनतेने स्वतःला अर्पण केलेले भारतीय संविधान हेच आपल्या लोकशाहीचे खरे अधिष्ठान आहे. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची मूल्ये अबाधित ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीशिल्पाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
