देशातील भ्रष्टाचार समूळ निपटून काढण्याबरोबरच लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसाठीच आंदोलन -राजन राजे








गटातटाच्या राजकारणाला बळी पडून आणि ग्रामसभेला राजकारणाचा अड्डा बनवून, सर्वसामान्य ग्रामस्थांचे हक्क डावलणा-या प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिका-यांच्या मनमानी कारभाराविरोधात शनिवार, दि. २० ऑगस्ट रोजी कामोठेवासीयांनी पुकारलेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कामोठे-जुई-नौपाडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे सुमारे १५० कार्यकर्ते या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले होते.
याप्रसंगी मावळ लोकसभा अध्यक्षा शोभना म्हात्रे, पनवेल विधानसभा अध्यक्ष गोपीनाथ भगत, उपाध्यक्ष संतोष गोवारी, सचिव भाऊ म्हात्रे, युवा अध्यक्ष सुमित गोवारी, युवा उपाध्यक्ष सागर म्हात्रे, युवा सचिव सचिन गोवारी, कामोठे शहर अध्यक्ष रत्नाकर गोवारी, उपशहर अध्यक्ष रमाकांत गोवारी, सचिव परशुराम म्हात्रे, कामोठे गाव अध्यक्ष गणेश नाईक, उपाध्यक्ष राजू म्हात्रे, सचिव महेंद्र म्हात्रे, जुई गाव अध्यक्ष चंद्रकांत चिमणे, उपाध्यक्ष अमृत कडू, सचिव स्वामी म्हात्रे, नौपाडा गाव अध्यक्ष बाबुराव भगत, उपाध्यक्ष प्रकाश भगत, सचिव रमेश भगत, सह-सचिव भगवान भगत आणि संपर्कप्रमुख पंढरीनाथ भगत आदी पदाधिका-यांसोबत ‘धर्मराज्य पक्षा’चे शेकडो कार्यकर्ते आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, उपाध्यक्ष राजू सावंत, खजिनदार जयेंद्र जोग, ‘धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष सचिन शेट्टी, नरेंद्र पंडित, ठाणे विधानसभा सह-सचिव विजय भोसले, खोपट विभाग अध्यक्ष राजू शिंदे, कोपरी-आनंदनगर प्रभाग अध्यक्ष नितीन वायदंडे, संदीप सोनखेडे, नितीन उगले, रॉजर सायमन, गौरव गोरे, विकास मंडपे, सुहास बुगडे, प्रकाश डोंगरे, ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा जयश्री पंडित, महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, शिक्षक संघटनेच्या महासचिव साक्षी शिंदे, ठाणे लोकसभा महिला सचिव दर्शना पाटील आणि मयुरी वायदंडे आदी पुरुष आणि महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिव्हिल हॉस्पिटलसमोरील इमारत क्रमांक दोनच्या गच्चीचा भाग शनिवारी (ता. ६) सायंकाळी कोसळल्याने पोलिस कुटुंबीय धास्तावले आहेत. पोलिस वसाहतींत राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारातून घरभाडेपट्टी व देखभाल खर्च घेतला जात असतानाही या इमारतींची व्यवस्थित देखभाल किंवा दुरुस्ती केली जात नव्हती. या इमारती ६० वर्षे जुन्या आहेत. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा नियम असतानाही एकही ऑडिट करण्यात आलेले नाही. या इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्बाधणी करणे आवश्यक आहे. दरम्यान, धोकादायक इमारतींतील जिने, व्हरांडे यांची स्थिती पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. इमारत क्रमांक २ मधील गच्चीचा कोबा तोडून केलेल्या दुरुस्तीमुळे पावसाळ्यात घरांत पाणी गळते, अशी तक्रार या इमारतीतील रहिवाशांनी केली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने संबंधित विभागास युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत व या वसाहतीतील पोलिस कुटुंबांचे जीवन सुसह्य करावे, या मागणीसंदर्भात ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने गुरुवार दि. ११ डिसेंबर-२०१४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान सरकारी विश्रामगृह, ठाणे येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
