Category: उपोषण

अण्णा हजारेंच्या बेमुदत आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘धर्मराज्य पक्षा’चे साखळी उपोषण सुरू !

देशातील भ्रष्टाचार समूळ निपटून काढण्याबरोबरच लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसाठीच आंदोलन -राजन राजे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे पुकारलेल्या आंदोलनाला ‘धर्मराज्य पक्षा’ने जाहीर पाठिंबा दिला असून, पक्षाच्या वतीने अण्णांच्या समर्थनार्थ कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अध्यक्ष मिलिंद कुवळेकर यांच्या नेतृत्वाखाली २ फेब्रुवारीपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. देशातील बोकाळलेला भ्रष्टाचार आणि त्याला उत्तेजन देणारी भ्रष्ट राजकीय व प्रशासकीय व्यवस्था यामुळेच देशापुढे सर्वच मूलभूत प्रश्न निर्माण झाले असून, अण्णा हजारेंच्या या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी, तसेच देशातील भ्रष्टाचार समूळ निपटून काढण्याबरोबरच लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी ‘धर्मराज्य पक्षा’ने लोकशाहीमार्गाने लढा उभारला असून, त्यासाठी आम्हीदेखील साखळी उपोषण सुरू केल्याचे पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्ते विक्रांत कर्णिक, पक्षाचे ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ सलगर, सचिव सुनील घाणेकर, कोपरी-आनंदनगर विभाग अध्यक्ष नितीन वायदंडे, माहिती अधिकार ठाणे कक्षप्रमुख अनिल महाडिक, अंजुर गावचे सरपंच मनीष तर, आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष गोविंद भगत या पदाधिकाऱ्यांसोबत नरेंद्र शिंदे, मनोज बेर्डे, सुशांत भोईर, संदीप सोनखेडे, गौरव गोरे, किशोर वाडकर, नरेंद्र पारकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, “देशातील भ्रष्टाचार समूळ उपटून काढायचा असेल, तर करसंरचना आणि अर्थकारणात आमूलाग्र बदल करावे लागतील” असे नमूद करून राजन राजे पुढे म्हणाले की, “अर्थक्रांती विधेयक खऱ्या अर्थाने भ्रष्ट राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांना सत्तेतील खुर्चीच्या उबेपासून तुरुंगातील मिरचीच्या धुरापर्यंत नेण्यास कारणीभूत ठरेल, त्यासाठी जन-लोकपाल कायदा त्वरित अंमलात आणला गेलाच पाहिजे, हीच आमची आग्रही मागणी आहे” असे ठाम प्रतिपादन राजे यांनी यावेळी बोलताना केले. २०११ साली अण्णा हजारेंच्या राष्ट्रव्यापी जनआंदोलनापुढे तत्कालीन सरकार नमले व त्यांनी जन-लोकपाल कायदा पारित केला. मात्र राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊनही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरदेखील या कायद्याची अद्यापपर्यंत अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करण्यात आली. गेल्या काही वर्षांत देशभरात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, दुर्दैवाने त्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. नापिकी, शेतीमालाला न मिळणारा हमीभाव आणि कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक यातच बळीराजा पार पिचून गेलेला आहे. याच पार्श्वभूमीवर झोपी गेलेल्या सरकारला खडबडून जागे करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’ने साखळी उपोषण सुरू केले असल्याचे पक्षाचे ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर यांनी शेवटी बोलताना म्हटले. यादरम्यान, ठाणे शहराच्या कोपरी परिसरातदेखील पक्षाच्या वतीने ठाणे लोकसभा सचिव विनोद मोरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे धरून, शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.

कामोठे ग्रामस्थांच्या लाक्षणिक उपोषणाला ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांची उपस्थिती…!

गटातटाच्या राजकारणाला बळी पडून आणि ग्रामसभेला राजकारणाचा अड्डा बनवून, सर्वसामान्य ग्रामस्थांचे हक्क डावलणा-या प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिका-यांच्या मनमानी कारभाराविरोधात शनिवार, दि. २० ऑगस्ट रोजी कामोठेवासीयांनी पुकारलेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कामोठे-जुई-नौपाडा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे सुमारे १५० कार्यकर्ते या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले होते.
यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. “प्रशासकीय व्यवस्थेत असलेल्या गुंडगिरीविरोधात लोकशाही मार्गानेच लढा दिला पाहिजे, त्यासाठी ‘धर्मराज्य पक्ष’ सदैव कामोठेवासीयांच्या पाठीशी राहील” अशा शब्दात राजन राजे यांनी आपला पाठिंबा दर्शवला.
याप्रसंगी मावळ लोकसभा अध्यक्षा शोभना म्हात्रे, पनवेल विधानसभा अध्यक्ष गोपीनाथ भगत, उपाध्यक्ष संतोष गोवारी, सचिव भाऊ म्हात्रे, युवा अध्यक्ष सुमित गोवारी, युवा उपाध्यक्ष सागर म्हात्रे, युवा सचिव सचिन गोवारी, कामोठे शहर अध्यक्ष रत्नाकर गोवारी, उपशहर अध्यक्ष रमाकांत गोवारी, सचिव परशुराम म्हात्रे, कामोठे गाव अध्यक्ष गणेश नाईक, उपाध्यक्ष राजू म्हात्रे, सचिव महेंद्र म्हात्रे, जुई गाव अध्यक्ष चंद्रकांत चिमणे, उपाध्यक्ष अमृत कडू, सचिव स्वामी म्हात्रे, नौपाडा गाव अध्यक्ष बाबुराव भगत, उपाध्यक्ष प्रकाश भगत, सचिव रमेश भगत, सह-सचिव भगवान भगत आणि संपर्कप्रमुख पंढरीनाथ भगत आदी पदाधिका-यांसोबत ‘धर्मराज्य पक्षा’चे शेकडो कार्यकर्ते आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

सावित्री नदी दुर्घटनेविरोधात धर्मराज्य पक्षाचा ठाण्यात लाक्षणिक उपोषण

महाडयेथील सावित्री नदीवरील दुर्घटनेसंदर्भात प्रस्थापित व मुजोर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि कोकणवासीयांच्या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या उपोषणाचे नेतृत्व ठाणे लोकसभा सचिव विनोद मोरे यांनी केले. महाडच्या दुर्घटनेनंतर ठाणे खाडीवर असलेला ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने, तो जोपर्यंत सुस्थितीत आणि सुरक्षित करण्यात येत नाही, तोपर्यंत कोपरी-आनंदनगर तसेच ऐरोली पुलाजवळील टोलवसुली बंद करण्यात यावी अशीही मागणी यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’कडून करण्यात आली.
याप्रसंगी राजन राजे यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. पक्षाच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, उपाध्यक्ष राजू सावंत, खजिनदार जयेंद्र जोग, ‘धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष सचिन शेट्टी, नरेंद्र पंडित, ठाणे विधानसभा सह-सचिव विजय भोसले, खोपट विभाग अध्यक्ष राजू शिंदे, कोपरी-आनंदनगर प्रभाग अध्यक्ष नितीन वायदंडे, संदीप सोनखेडे, नितीन उगले, रॉजर सायमन, गौरव गोरे, विकास मंडपे, सुहास बुगडे, प्रकाश डोंगरे, ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा जयश्री पंडित, महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, शिक्षक संघटनेच्या महासचिव साक्षी शिंदे, ठाणे लोकसभा महिला सचिव दर्शना पाटील आणि मयुरी वायदंडे आदी पुरुष आणि महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाण्यातील पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीसाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने लाक्षणिक उपोषण

सिव्हिल हॉस्पिटलसमोरील इमारत क्रमांक दोनच्या गच्चीचा भाग शनिवारी (ता. ६) सायंकाळी कोसळल्याने पोलिस कुटुंबीय धास्तावले आहेत. पोलिस वसाहतींत राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारातून घरभाडेपट्टी व देखभाल खर्च घेतला जात असतानाही या इमारतींची व्यवस्थित देखभाल किंवा दुरुस्ती केली जात नव्हती. या इमारती ६० वर्षे जुन्या आहेत. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा नियम असतानाही एकही ऑडिट करण्यात आलेले नाही. या इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्बाधणी करणे आवश्यक आहे. दरम्यान, धोकादायक इमारतींतील जिने, व्हरांडे यांची स्थिती पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. इमारत क्रमांक २ मधील गच्चीचा कोबा तोडून केलेल्या दुरुस्तीमुळे पावसाळ्यात घरांत पाणी गळते, अशी तक्रार या इमारतीतील रहिवाशांनी केली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने संबंधित विभागास युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत व या वसाहतीतील पोलिस कुटुंबांचे जीवन सुसह्य करावे, या मागणीसंदर्भात ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने गुरुवार दि. ११ डिसेंबर-२०१४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान सरकारी विश्रामगृह, ठाणे येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

error: Content is protected !!