———————————-
मराठी ही जगातील एकमेव निसर्ग-पर्यावरणस्नेही भाषा!
‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांचे मातृभाषेप्रती गौरवोद्गार…
———————————-


मुंब्रा येथे रेल्वे अपघातात बळी पडलेल्या, प्रवाशांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने बुधवार, दि. ११ जून-२०२५ रोजी, ठाणे रेल्वे स्थानकपरिसरात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी फलकांच्या माध्यमातून, रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि उदासीन भूमिकेविरोधात, निषेधाच्या घोषणा व्यक्त करीत, प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे नेतृत्व, पक्षाचे सहसचिव श्री. नरेंद्र पंडित यांनी केले होते. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे प्रवक्ते श्री. समीर चव्हाण, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष श्री. महेशसिंग ठाकूर, श्री. सचिन शेट्टी, ‘धर्मराज्य रिक्षा संघटने’चे श्री. रमेश रेड्डी, श्री. सुशीलकुमार चंद्रा आदी पदाधिकाऱ्यांसह, श्री. संजय दळवी, श्री. सोपान चौधरी, श्री. अमित लिबे, श्री. निलेश सावंत, श्री. अनिल डांगळ, श्री. सुनील जाधव, श्री. संतोष मोरे, श्री. सुनील डांगळ इत्यादी कार्यकर्ते आणि कामगार सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
मा. खासदार व शिवसेना नेते राजनजी विचारे यांची कनिष्ठ कन्या धनश्री, हिच्या ‘ताज द् ट्रीज बॅन्क्वेट’मधील दि. ९ मे रोजीच्या वाङनिश्चय (साखरपुडा) सभारंभप्रसंगी गप्पा-हास्यविनोदात रंगलेल्या राजकीय नेत्यांची क्षणचित्रे
दि. १९ जानेवारी-२०२५ (रविवार) रोजी धर्मराज्य पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी आपले सुपूत्र ऋग्वेद राजे, ठाण्याचे माजी खासदार सर्वश्री राजनजी विचारे यांच्यासमवेत आपल्या सहकाऱ्यांसह (महेश ठाकूर, समीर चव्हाण, राजेश गडकर) शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांची मातोश्री बंगल्यावर भेट घेतली.
या भेटीदरम्यान प्रचलित ‘ईव्हीएम’वरील (EVM) अत्यंत संशयास्पद व शंकास्पद मतप्रक्रियेसंदर्भाने सखोल चर्चा झाली आणि ठाणे-जिल्हा प्रीपेड स्मार्ट मीटर (घरगुती इलेक्ट्रिक मीटर) विरोधी समितीला लवकरच भेटीसाठी बोलावण्याचं आश्वासन दिलं.
बैठकीत मा. उद्धवजींनी EVM मुद्द्यापलिकडे जाऊन मतदानासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांना स्पर्श केला व उपस्थित सर्वांना एकूणच मतप्रक्रियेबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं. राजन राजे यांनी सत्ताधारी भाजप-NDA आघाडी, ‘प्रजासत्ताका’चा अमृतमहोत्सव (वर्ष १९५० ते वर्ष-२०२५) साजरा करण्याबाबत पूर्णतया उदासीन असण्यामागे, त्यांचा ‘प्रजासत्ताक-संकल्पने’लाच (प्रजा म्हणजेच जनता, देशाची मालक असण्याच्या लोकशाही-तत्त्वाला) मुळातून विरोध असल्याचा मुद्दा ठासून मांडला…मुठभरांच्या हातात सत्ता केंद्रित करण्याची, वर्णवर्चस्ववादी-शोषक मानसिकता असणाऱ्यांचा भाजप हा पक्ष असल्यानेच, ते घडत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच, EVM हॅक अथवा मॅनेज (प्रोग्रॅम्ड) होवोत वा न होवोत…आता, जनतेला पूर्वीचीच कागदी-मतपत्रिकेवरील पारदर्शक-मतदानप्रक्रिया हवी असल्याचं, राजन राजे यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केलं व त्यासंदर्भात ‘धर्मराज्य पक्ष’ मोहिम राबवत असल्याचं व प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवदिनी म्हणजेच, २६ जानेवारी-२०२५ रोजी रात्रौ ठीक ९.०० वा. फक्त ५ मिनिटे ‘ईव्हीएम’चा निषेध म्हणून सर्व घरातील लाईट्स बंद ठेवण्याचं आवाहन केलं जात असल्याचंही…मा. उद्धवजींच्या कानावर घातलं.
याचसंदर्भात, दि. २८ जानेवारी रोजी (मंगळवार) सायंकाळी ६.०० वा. ठाणे (प.), जांभळी नाका येथील ‘शिवाजी मैदाना’त राहुल चिमणभाई मेहता यांनी बनवलेल्या ईव्हीएम-मशीनद्वारे अमित उपाध्याय, मेघराज जोशी यांचा चमू (Team), ‘ईव्हीएम’ (EVM) कसं ‘मॅनेज’ केलं जाऊ शकतं (भले हॅक होऊ शकत नसलं तरी)…याचं प्रात्यक्षिक आयोजित केल्याची माहितीही शिवसेना पक्षप्रमुखांना दिली. त्यावर, मा. उद्धवजींनी त्यादिवशी मुंबईत असल्यास, सदर कार्यक्रमाला आवर्जून येण्याचं आश्वासन दिलं.
भविष्यात ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी, “ईव्हीएम हटाव… देश बचाव… बॅलेट-पेपर लाव” या घोषणेखाली, मतपत्रिकेद्वारे निवडणुकांसाठीची लोकचळवळ सुरु करण्यात आली असून, दि. १४ डिसेंबर-२०२४ रोजी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील, मुंबई मराठी पत्रकार संघ येथे, एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला निवृत्त न्यायमूर्ती मा. बी.जी. कोळसे-पाटील, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे, डाव्या चळवळीतील नेते मा. फिरोज मिठीबोरवाला, आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. धनंजय शिंदे, मा. मेहमूद प्राचा, प्रा. अमित उपाध्याय आणि विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर, अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या मरकडवाडी गावचे सरपंच मा. रणजित मरकड आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सर्व समविचारी पक्ष आणि सामाजिक संस्था/संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी, ‘ईव्हीएम’विरोधी लोकचळवळ, यापुढे आक्रमकपणे सुरु ठेवत, मतपत्रिकेद्वारे निवडणुका पार पाडण्यासाठी, मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. या बैठकीचे आयोजन अमीन सोलकर, शरद कदम, संतोष आंबेकर, एम.ए. खालिद यांनी केले होते. दरम्यान, मतपत्रिकेवरील मतदानाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी, ‘प्रजासत्ताक दिना’चे औचित्य साधून, दि. २६ जानेवारी-२०२५ रोजी, रात्रौ ठीक ९ वाजता, फक्त ५ मिनिटांसाठी आपल्या घरातील, कार्यालयातील व जिथे जिथे शक्य असेल त्या ठिकाणचे, लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध नोंदविण्याचे विनम्र आवाहन मा. राजन राजे यांनी उपस्थित मान्यवरांना केले.