आज दि. १३ मे २०२६ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान येथे आंबा आणि काजू बागायतदारांच्या प्रश्नांवरील सर्वपक्षीय आणि नागरी समाजातील चळवळीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेस ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे उपस्थित होते.कोकणातील आंबा, काजू व मत्स्य व्यवसायाशी संबंधित शेतकरी गंभीर संकटात सापडले असून त्यांना तातडीने न्याय मिळावा, संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करावी तसेच नुकसानग्रस्त बागायतदारांना योग्य आर्थिक मदत देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या आगामी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
त्याचप्रमाणे या पत्रकार परिषदेत विनायक राऊत (शिवसेना उबाठा), भाई जगताप (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), कॉ. अजित नवले (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), कॉ. प्रकाश रेड्डी (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), प्रभाकर नारकर (जनता दल सेक्युलर), डॉ. दीपक पवार (मराठी अभ्यास केंद्र) तसेच विविध शेतकरी, सामाजिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी व्यापक जनआंदोलन उभे करण्याची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.