बुद्धपौर्णिमेनिमित्त ठाणे शहरातील कोपरी परिसरात ‘गौतम मित्र मंडळा’च्या वतीने आयोजित “बुद्धपौर्णिमा व संयुक्त जयंती महोत्सव–२०२६” हा कार्यक्रम दि. ०१ मे ते दि. ०५ मे २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडला.या सोहळ्यास ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. तसेच, भाजपचे कोपरी–पाचपाखाडीचे आमदार संजय केळकर यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश गाडे यांनी मा. राजन राजे यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.
आपल्या मनोगतात मा. राजन राजे यांनी तथागत बुद्धांच्या विचारांचा आजच्या जगभरातल्या युद्धजन्य परिस्थितीत व निसर्ग-पर्यावरणावर निरंतर होणाऱ्या आघातांचा विचार करता….सर्वत्र प्रसार होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज निर्माण करण्याचे आवाहन केले तसेच युवकांनी बुद्धांच्या शिकवणीचा आदर्श घेऊन सामाजिक परिवर्तनासाठी पुढे यावे, असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी ‘गौतम मित्र मंडळा’चे उपाध्यक्ष श्री. अमुल कदम, सेक्रेटरी श्री. कुंदन सपकाळे, खजिनदार श्री. सुमित कदम, श्री. अनंता चंदने यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.