Blog

धर्मराज्यपक्षातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

‘धर्मराज्य पक्ष’ ऐरोली विधानसभा, प्रभाग क्र. ४ च्यावतीने गुरुवार, दि. ३० जून रोजी १०वी आणि १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा’ विष्णूनगर, दिघा (नवी मुंबई) येथे आयोजित करण्यात आला होता. ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष मा. श्री. राजू सावंत, शिक्षक संघटनेच्या महासचिव साक्षी शिंदे, महासचिव मा. श्री. रामभाऊ कोंडाळकर पक्षाच्या आणि महिला सचिव दर्शना पाटीलयांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पक्षाचे भिवंडी विधानसभा अध्यक्ष भरत हलपतराव, विदर्भ संपर्कप्रमुख विजय नांदूरकर, महाड-पोलादपूर विधानसभा अध्यक्ष संभाजी पार्टे, ऐरोली विधानसभा उपाध्यक्ष मंगेश पिंगळे, ऐरोली विधानसभा सहसचिव रत्नदीप कांबळे, सिद्देश सावंत ऐरोली विधान सभा सचिव युवा कार्यकर्ते नितीन उगले आदी मान्यवर उपस्थित होते. या गुणगौरव सोहळ्यात दिघा-ऐरोली परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसोबत मोठया संख्येने उपस्थिती लावली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग क्र. ४ चे अध्यक्ष गणेश पोटभरे, उप-अध्यक्ष आकाश पाईकराव, तसेच रवी नाईक, किशोर शिरोळे, शेखर गायकवाड, फ्रान्सिस, मनोरमा मोरे, नरेश सरकन्य इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. या गुणगौरव सोहळ्याला ऐरोली विधानसभा क्षेत्रातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

समाजातील चांगल्या लोकांमुळेच बदल शक्य ! कामोठयातील प्रकल्पग्रस्तांच्या सभेत राजन राजेंचे प्रतिपादन

सामाजिक आणि राजकीय बदल घडवायचा असेल तर, आपल्या समाजातील चांगल्या लोकांनी पुढे येऊन सत्ता ताब्यात घेतल्यास बदल शक्य असल्याचे स्पष्ट प्रतिपादन `धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी कामोठे येथील जाहीर सभेत बोलतांना केले. कामोठे येथील `धर्मराज्य पक्ष’प्रणित `स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटने’ने आयोजित केलेल्या या जाहीर सभेत पनवेल आणि परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. जुई-कामोठे-नौपाडा या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन बुधवार, दि. १५ जून रोजी कराडी समाज हॉल, कामोठे येथे ही सभा आयोजित केली होती.
दरम्यान, प्रकल्पग्रस्त शेतक-यांना संबोधित करतांना राजन राजे म्हणाले की, ’संपूर्ण रायगड जिल्ह्यात दि. बा. पाटील यांच्यानंतर एकही प्रभावी नेता नंतरच्या काळात निर्माण न झाल्यामुळेच दुर्दैवाने आपल्या समाजाची आज दुरवस्था झाली आहे आणि म्हणूनच सामाजिक क्रांती तसेच राजकीय बदल घडवायचा असेल तर समाजातील चांगल्या लोकांनी पुढे येऊन सत्ताधीश झालेच पाहिज“ अशा शब्दांत राजन राजे यांनी आपली रोखठोक मतं व्यक्त केली. त्यानंतर `धर्मराज्य महिला संघटने’च्या मावळ लोकसभा अध्यक्षा शोभना म्हात्रे, `धर्मराज्य पक्षा’चे महासचिव राम कोंडाळकर, नव-नियुक्त पनवेल अध्यक्ष गोपीनाथ भगत, पनवेल तालुका युवक अध्यक्ष सुमित गोवारी,पनवेल सचिव भाऊ म्हात्रे, कामोठे शहर अध्यक्ष रत्नाकर गोवारी, कामोठे शहर सचिव परशुराम म्हात्रे, अड . विजय कुर्ले, ज्येष्ठ पत्रकार सुरेश कराले, कामोठे गावचे माजी सरपंच विठोबा म्हात्रे आदींनी आपली मते व्यक्त केली.
यादरम्यान, पनवेल आणि कामोठे शहरांमध्ये येणारा नैना प्रकल्प, कामोठे ग्रामपंचायतीचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याचा प्रस्ताव, प्रस्तावित महानगरपालिकेत समाविष्ट होणारा गावठाण विस्तार तसेच प्रकल्पग्रस्तांच्या उर्वरित राहिलेल्या मागण्या इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पनवेल शहर अध्यक्ष म्हणून गोपिनाथ भगत, उपाध्यक्ष संतोष गोवारी, सचिव भाऊ म्हात्रे, पनवेल तालुका युवक अध्यक्ष सुमित गोवारी, उपाध्यक्ष सागर म्हात्रे, सचिव सचिन गोवारी, कामोठे शहर अध्यक्ष रत्नाकर गोवारी, उपाध्यक्ष रमाकांत गोवारी, सचिव परशुराम अंबाजी म्हात्रे, कामोठे गाव अध्यक्ष गणेश नाईक, उपाध्यक्ष राजू म्हात्रे, सचिव महेंद्र म्हात्रे, जुई गाव अध्यक्ष चंद्रकांत चिमणे, उपाध्यक्ष अमृत कडू, सचिव स्वामी म्हात्रे आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

ठामपातील बेसुमार वृक्षतोडीविरोधात `धर्मराज्य पक्षा’ ची निदर्शने

रस्तारूंदीकरण आणि शहरीकरणाच्या नावाखाली ठाणे महानगरपालिकेने सध्या शहरातील नौपाडा, वर्तकनगर आणि पोखरण रोडवरील डेरेदार वृक्ष निर्दयीपणे कापायला सुरूवात केली आहे. एकाअर्था, ठामपा पुरस्कृत निसर्ग आणि पर्यावरणाचा खून पाडण्याचं कार्य महापालिका प्रशासनानं हाती घेतलेलं असून, त्याचाच निषेध करण्यासाठी `धर्मराज्य पक्षा’च्यावतीने शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ `वसुंधरा दिना’च्या पार्श्वभूमीवर तीव्र निदर्शने करण्यात आली. ठाणे शहराला लाभलेला निसर्गाचा समृध्द वारसा यानिमित्ताने नष्ट होण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप यावेळी `धर्मराज्य पक्षा’ने ठाणे महापालिका प्रशासनावर केला आहे.
दरम्यान, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहर विकासाच्या आणि रस्तारूंदीकरणाच्या आड येणारी अनधिकृत बांधकामे तोडण्यास धुमधडाक्यात सुरूवात केली आहे. आयुक्तांच्या या धडाडीचे ठाणेकर नागरिकांनी कौतुक केले असले; तरी, बेसुमार वृक्षतोडीमुळे नागरिक नाराज झालेले आहेत. नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनी विभागात सध्या प्रस्तावित उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असून, त्यासाठी संपूर्ण महात्मा गांधी रस्त्यावरील झाडांच्या कत्तली झाल्या आहेत. मुळात याठिकाणी उड्डाणपूलाची आवश्यकता नसतांना तो उभारण्याचा घाट कुणाला खूष करण्यासाठी घातला जातोय? असा सवालदेखील `धर्मराज्य पक्षा’ने यावेळी उपस्थित केला आहे. याप्रसंगी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष सचिन शेट्टी, नरेंद्र पंडित, धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे महासचिव महेशसिंग ठाकूर, धर्मराज्य महिला संघटनेच्या समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा अध्यक्षा जयश्री पंडित, नवी मुंबई शहर उपाध्यक्षा रेखा साळूंखे, दर्शना पाटील, गिता पाटील, उज्ज्वला जाधव, पोर्णिमा सातपुते, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ सलगर, सहसचिव दिनेश चिकणे, प्रभाग क्र. ४७ चे प्रभाग अध्यक्ष समीर कालगुडे, प्रभाग क्र. 24 चे प्रभाग अध्यक्ष राजू शिंदे, डोंबिवली शहर अध्यक्ष जगदीश जाधव, ठाणे शहर माहिती अधिकार कक्ष प्रमुख अनिल महाडिक, बेलापूर विधानसभा अध्यक्ष निवास साळुंखे, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्ष प्रा. भरत जाधव, प्रकाश पवार, दिपक देशपांडे, युवा कार्यकर्ता संदीप सोनखेडे, अमित लिबे, मनोज बेर्डे, गंभीर आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

लक्ष्मीनारायण यांच्या बदलीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’चा निषेध मोर्चा आणि निदर्शने

, , ,

ठाण्याचे मावळते सह-पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या बदलीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’ने शुक्रवारी एका निशेध मोर्चाचे आयोजन केले होते. प्रामाणिक आणि कर्तव्यकठोर अशी ओळख असलेले लक्ष्मीनारायण यांनी आपल्या कार्यकाळात ठाण्यातील समाजकंटकांवर व भ्रष्ट राजकारण्यांवर चांगलाच वचक ठेवला होता. सूरज परमार आत्महत्या प्रकरणाचा तपासदेखील त्यांच्याच देखरेखीखाली सुरू असल्याने, परमारप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी नगरसेवकांचा पाय अधिकाधिक खोलात गेला होता. यामुळे लक्ष्मीनारायण हे सत्ताधारी आणि विरोधकांचा मुख्य अडसर ठरू पाहात होते. म्हणूनच राजकीय दबावापोटी बढतीच्या नावाखाली मुंबईतील पोलिस मुख्यालयात (अडगळीच्या ठिकाणी) अतिरिक्त महासंचालक (प्रशासन) पदी बदली करून, महाराष्ट्र शासनाने एका कर्तबगार ‘अॅक्शनबाज’ अधिका-याला ‘अॅक्शनबाद’;”kick up & kick out” केल्याच्या निशेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’ने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक निशेध मोर्चा काढला होता.

दरम्यान, चंदनवाडीतील रायगड गल्ली येथून सुरू झालेला हा निशेध मोर्चा ठाणे महापालिकेवरून गोखले रोड मार्गे नौपाडा परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे षेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित होते. बांधकाम व्यवसायिक सूरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांना मानसिक त्रास देणा-या ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवकांची नावे नोंद केली होती. त्यानंतर ठामपातील चार नगरसेवकांना अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास लक्ष्मीनारायण यांच्याकडे असल्याने, ठाण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली होती. शेवटी राजकीय दबावाचा वापर झाल्याने महाराश्ट्र शासनाने बढतीच्या बहाण्याने ठाणेकर नागरिकांचे आधारस्तंभ ठरलेल्या व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांची उचलबांगडी करीत मुंबईतील पोलिस मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक (प्रषासन) म्हणून बदली केली आणि परमार आत्महत्येप्रकरणाचा गतिमान झालेला तपास संथ करण्याचे महापाप केले.

व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे ठाणेकरांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त होत असतानाच ‘धर्मराज्य पक्षा’ने १२,१३,१४ जानेवारी या तीन दिवसात ठाण्याच्या विविध भागात स्वाक्षरी मोहिम राबवून लक्ष्मीनारायण यांच्या बदलीला विरोध दर्षविला. हजारो ठाणेकरांनीदेखील या बदलीचा निषेध करून स्वाक्षरी मोहीमेला उदंड प्रतिसाद दिला. या दरम्यान, ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांना पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन, लक्ष्मीनारायण यांच्या राजकीय हस्तक्षेपातून झालेल्या बदलीचा निशेध केला. ‘धर्मराज्य पक्षा’च्या मोर्चाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर ठाणे रेल्वे

स्थानक परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांची बदली म्हणजे निव्वळ राजकीय हेतूने झालेली असून, ठाण्यातील सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूच्या राजकारण्यांची मिलीभगत असल्याचा थेट आरोप पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी प्रसिध्दीमाध्यमांषी बोलतांना केला. एका ‘अॅक्शनबाज’ अधिका-याल ‘अॅक्शनबाद’ करून भारतीय जनता पक्ष राश्ट्रवादी काॅंगे्रसला आपल्या दबावाखाली आणत असल्याचे विधान त्यांनी यावेळी बोलतांना केले. सज्जनतेचा आव आणून ‘‘लक्ष्मीनारायण’’ यांची बदली रद्द करण्यासाठी, स्वपक्षीय मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचे ‘नाटक’ करणा-या, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी या बदलीप्रकरणी, आमदारकीचा ‘राजीनामा’ देवून आपल्या प्रामाणिकतेचा प्रत्यय द्यावा… अन्यथा, ठाणेकरांना उल्लू बनवू पाहणारी आपली राजकीय-नौटंकी बंद करावी, असे आव्हान दिले.

टीव्ही 9 वर झालेल्या एका परिसंवादाचा उल्लेख करत, ‘‘राम कदम नावाचा एक राजकीय दलाल, यावेळी लक्ष्मीनारायण यांच्या बदलीचे समर्थन करीत होता’’. या अशाच प्रवृत्तीमुळे देशात, महाराश्ट्रात राजकारण बदनाम झालयं. आम्हाला फक्त पाच किंवा दहा चांगले राजकारणी दाखवा, आम्ही ‘धर्मराज्य पक्षा’चे राजकारण बंद करून टाकतो’’, असे रोखठोक विधान करून, आमचे आजचे आंदोलन हे व्यक्तिसापेक्ष नसून, नीतिभ्रष्ट प्रवृत्तीविरूध्द असल्याचे पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी आपल्या भाषणात स्पश्ट केले.

याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव राम कोंढाळकर, उपाध्यक्ष राजू सावंत, अण्णा साळुंखे, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सदस्य मधुकर पवार, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, सचिव विनोद मोरे, उपाध्यक्ष नरेंद्र पंडित, सचिन शेट्टी, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ सलगर, सचिव चंदू येरूणकर, सहसचिव विजय भोसले, दिनेश चिकणे, माहिती अधिकार ठाणे शहर कक्षप्रमुख अनिल महाडिक, धर्मराज्य महिला संघटनेच्या अध्यक्षा जयश्री पंडित, सचिव साक्षी शिंदे, सहसचिव दर्शना पाटील, सदस्या वैशाली भवालकर, पौर्णिमा सातपुते, उज्वला जाधव, सोनम तारकर, मिनल मल्या, नवीमुंबई शहर अध्यक्षा शितल कोळी, उपाध्यक्षा रेखा साळुंखे, शिक्षक संघटनेचे सहसचिव प्रा. भरत जाधव, प्रभाग अध्यक्ष महेश क्षिरसागर, बेलापूर विधानसभा अध्यक्ष निवास साळुंखे, कामोठ्याचे सुमित गोवारी, सागर म्हात्रे, ऐरोली विधानसभा अध्यक्ष पांडूरंग गोरे, सचिव सिध्देश सावंत, युवा अध्यक्ष संतोष काजारे, भिवंडी लोकसभा अध्यक्ष भरत हलपतराव, मुरबाड विधानसभा अध्यक्ष नरेश रसाळ आदी मान्यवर तसेच, इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न

, , , , ,

‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे खोपट विभागतर्फे ‘रक्तदान शिबीर’ संपन्न झाले. या शिबीरात ऐच्छिक ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सिव्हील रूग्णालयाचे डाॅ. मनोजकुमार मोहन, शिल्पा कुलकर्णी (स्टाफ नर्स), अमृत झोमरे (टेक्निशिएन), रूपाली कदम (टेक्निकल सुपरवायझर), पल्लवी कैतकर (पी.आर.ओ.), दया सुतार (स्टुडन्ट नर्स), कोमल हुंडारे (स्टुडन्ट नर्स), वत्सला राठोड (अटेन्डन्ट), राधा मखवाना (अटेन्डन्ट), उमेश वाघचैरे (ब्लड आॅन काॅल बाॅय) यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदानपूर्वी तपासण्या व रक्तदान घेण्यात आले. यावेळी ऐच्छिक ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना ‘सिव्हील रूग्णालया’तर्फे रक्तदान कार्ड व प्रमाणपत्र देण्यात आले. सदर ‘रक्तदान शिबीर’ रविवार, दि. ८ फेब्रुवारी-२०१५ रोजी, सकाळी १०.०० ते दुपारी २.०० यावेळेत संपन्न झाले.

या शिबीराचे आयोजन ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाण्यातील खोपट प्रभागातर्फे प्रभाग अध्यक्ष राजू षिंदे व उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष सुनिल घाणेकर यांनी केले होते. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे, महासचिव राजू फणसे, उपाध्यक्ष नितीन देषपांडे, ‘धर्मराज्य महिला संघटना’ अध्यक्षा जयश्री पंडित, ठाणे जिल्हा समन्वयक राजेश गडकर, ठाणे जिल्हा सचिव नरेंद्र पंडित, ठाणे शहर अध्यक्ष सचिन शेट्टी, ठाणे शहर सचिव समीर चव्हाण, सहसचिव विजय भोसले, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेषसिंग ठाकूर, सचिव रूपेष पवार  आदी मान्यवर उपस्थित होते.

ठाण्यातील पोलीस वसाहतींच्या दुरुस्तीसाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने लाक्षणिक उपोषण

सिव्हिल हॉस्पिटलसमोरील इमारत क्रमांक दोनच्या गच्चीचा भाग शनिवारी (ता. ६) सायंकाळी कोसळल्याने पोलिस कुटुंबीय धास्तावले आहेत. पोलिस वसाहतींत राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारातून घरभाडेपट्टी व देखभाल खर्च घेतला जात असतानाही या इमारतींची व्यवस्थित देखभाल किंवा दुरुस्ती केली जात नव्हती. या इमारती ६० वर्षे जुन्या आहेत. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा नियम असतानाही एकही ऑडिट करण्यात आलेले नाही. या इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्बाधणी करणे आवश्यक आहे. दरम्यान, धोकादायक इमारतींतील जिने, व्हरांडे यांची स्थिती पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. इमारत क्रमांक २ मधील गच्चीचा कोबा तोडून केलेल्या दुरुस्तीमुळे पावसाळ्यात घरांत पाणी गळते, अशी तक्रार या इमारतीतील रहिवाशांनी केली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य सरकारने संबंधित विभागास युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत व या वसाहतीतील पोलिस कुटुंबांचे जीवन सुसह्य करावे, या मागणीसंदर्भात ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने गुरुवार दि. ११ डिसेंबर-२०१४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान सरकारी विश्रामगृह, ठाणे येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

उल्हासनगर येथे मोफत हृद्यविकार तपासणी शिबीर

, , ,

‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘गोदरेज मेमोरियल रूग्णालय’’ यांच्या संयुक्त विद्यमाने राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उल्हासनगर येथे मोफत हृद्याविकार तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

या शिबीरात भगव्या व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना रक्तदाब तपासणी (३० वर्षावरील व्यक्तींसाठी), मधुमेह तपासणी (३० वर्षावरील व्यक्तींसाठी), डॉक्टरी सल्ल्यानुसार ECG (हृद्यास्पंदनालेख) तपासणी आदी तपासण्या व डॉक्टरांचा सल्ला मोफत देण्यात येणार आहे. सदर शिबीर रविवार, दि. ७ डिसेंबर-२०१४ रोजी, सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० यावेळेत, साईनाथ मित्र मंडळ, एमआयडीसी वॉटर टँक रोड, बिर्ला मंदिर, शिवनेरी नगर, उल्हासनगर-1 या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक लोकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘‘धर्मराज्य पक्षा’’चे उल्हासनगर (शहर) विधानसभा अध्यक्ष गौतम बस्ते यांनी केले आहे.

इडिकॉन, मुंबई कामगारांना मिळणार रूपये १४,४४०/- रूपयांची भरघोस वाढ.

, , , , ,

मुंबईतील गोरेगांव येथील मे. इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापन आणि राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’’ यांच्यात, त्रैवार्षिक पगारवाढीचा विक्रमी करार संपन्न झाला. या करारामुळे, ‘‘इडिकॉन’’ कामगारांना रूपये १४,४४०/- रूपयांची भरघोस वाढ मिळणार आहे.

मुंबईतील गोरेगांव येथील मे. इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापन आणि राजन राजे यांच्या अध्यक्षतेखालील ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’’ यांच्यात १ जानेवारी-२०१४ ते ३१ डिसेंबर-२०१६ या त्रैवार्षिक पगार वाढीचा करार संपन्न झाला. यानुसार किमान रूपये 10,000/- तर, कमाल वाढ रू. 4,440/- इतकी वाढ करण्यात आलेली आहे. सदर पगारवाढीपैकी 70 टक्के रक्कम बेसिक व उर्वरीत 30 टक्के रक्कम इतर भत्यात समाविष्ट करण्यात खास कामगार हिताचा फॉर्म्युला अमलांत आलेला असून पूर्ण वाढीव रक्कम ही 50:25:25 या पध्दतीने तीन वर्षात देण्यात येईल. या करारानुसार 5 ते 10 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना 15 दिवसाची ग्रॅच्युईटी, तर 10 ते 15 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना 20 दिवसाची ग्रच्युईटी, तसेच 15 ते 20 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना 25 दिवासांची ग्रच्युईटी देण्यात आली, हे या कराराचे खास वैशिष्ट्या आहे. त्याचप्रमाणे निवृत्तीची वयोमर्यादा 58 वर्षावरून 60 वर्ष अशी 2 वर्षांने वाढविण्यात आली आहे. तसेच 22 कंत्राटी कामगारांपैकी 9 कामगारांना परमनंट केले असून उर्वरीत 14 कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देऊन, त्या कामगारांना सेवाकाळाप्रमाणे 20 लाख 50 हजार रूपयांची भरपाई देण्यात आली.

इडिकॉन कंपनीच्या वतीने करार करतांना, कंपनीचे मालक श्री. ऑब्री, व्यवस्थापक श्री. पद्माकर आठवले, श्री. मेलवीन फर्नांडीस हजर होते, तर ‘‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या वतीने अध्यक्ष राजन राजे, महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव रूपेश पवार, खजिनदार अण्णा साळुंखे इत्यादी पदाधिकारी तसेच, कंपनी युनिटचे कमिटी सदस्य उपस्थित होते.

कराराप्रसंगी बोलतांना, महासंघाचे अध्यक्ष राजन राजे म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलमुळे, प्रती महिना रूपये 5,000/- ते 6,000/- चे वेतन देऊन, कामगारांची लुट करून, कंत्राटदारी-मजूरीसारख्या गुलामगिरीला व नव-अस्पृश्यतेला कामगारांना तोंड द्यावे लागणार आहे. अशावेळी महाराष्ट्रातल्या मराठी कामगारांमध्ये, राजकीय जागृतीचे भान, या करारामुळे येईल आणि महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तीच, महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मुळावर आलेले चित्र बदलेल आणि या करारामुळे नवीन गती प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. सामान्य जनतेच्या दृष्टीने अत्यंत घातकी असलेल्या, खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण (खाउजा) या आर्थिक सुधारणांच्या तडाख्याने चैतन्यहीन झालेल्या कामगार चळवळीत केशव सुतांच्या तुतारीप्रमाणे ‘‘प्राण फुंकणारा’’ असा हा ‘इडिकॉन मायनिंग इक्युपमेंट प्रा. लि.’ व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’मधील क्रांतीकारी-करार असल्याचे कामगार क्षेत्रांत बोलले जात आहे. या करारानंतर, इडिकॉन, मुंबई येथील कंपनीतील कामगारांनी एकमेकांना मिठाई भरवून भरघोस पगारवाढीची दिवाळी साजरी केली.

धर्मराज्य पक्ष’ वाटणार ‘चिमण्यांची घरटी

जागतिक चिमणी दिनानिमित्त, भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्ष’, 20 मार्च रोजी, पर्यावरण संरक्षणासाठी वाया गेलेल्या लाकूडफाट्यातून शेकडो ‘चिमण्यांची घरटी’, गृहसंकुल-चाळीत वाटणार असल्याची माहिती ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी दिलीय. गेली तीन वर्षे हा उपक्रम ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने सुरू आहे.

चिमण्या, या पर्यावरणातील बदलांबाबत खूपच संवेदनशील असतात. धूर, दूषित पाणी, कर्णकर्कश आवाज, मोबाईल फोनची किरणे, प्रदूषित वातावरण, चिमण्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. जगभरात चिमण्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी, शिसारहित पेट्रोलमध्ये ‘मिथेल टेरिटेरी ब्यूटेल इथर’ या अॅण्टी नॉकिंग एजंट म्हणून काम करणाऱ्या पदार्थामुळे लहान पिलांसाठी पोषक असलेले वातावरणातील लहान किडे मारले जातात. लहान वयात हे किडे न मिळाल्यामुळे चिमण्यांचा बालमृत्यू दर वाढला आहे. वृक्षतोडीमुळे झाडे, गवत, पालापाचोळा उपलब्ध नाही. यामुळे चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी जागा शिल्लक नाही आणि घरटे तयार करण्यासाठी कच्चा मालही उपलब्ध नाही! सिमेंटच्या घरांमुळे घराबाहेरही घरट्यांसाठी जागा नाही!! पूर्वी अंगणात धान्य वाळवले जात असे. अंगणातच भांडी धुतली जायची यामुळे धान्य आणि अन्नाचे कण हे चिमण्यांचे खाद्या असायचे पण फ्लॅट संस्कृतीमुळे घराला अंगण राहिलेले नाही. झाडांवर जागा नाही आणि बाहेर ससाणा&कावळा सारख्या शत्रूंचा सामना तर साप, इतर पक्ष्यांमुळे चिमण्यांची अंडी भक्ष्य बनलेली! यामुळे आपल्या मित्रांना आपण शत्रूंच्या हाती सोपविलेय! गेल्या 10 वर्षात भारतातील शहरी भागात चिमण्यांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत तर ग्रामिण भागात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत घटली आहे, अशी दाहक स्थिती असल्याचं राजन राजे यांनी स्पष्ट केलं.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी ‘चिमणी’ हा निसर्गाचा अत्यंत आवश्यक घटक आहे. यामुळे चिमण्यांच्या संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी आपली आहे. यासाठी 20 मार्च जागतिक चिमणी दिनाचं औचित्य साधून भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेल्या ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे पर्यावरण संरक्षणासाठी, वाया गेलेल्या लाकूडफाट्यातून शेकडो ‘चिमण्यांची घरटी’ वाटून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला जाणार आहे. ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे सतत तीन वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रिकाम्या खोक्यांना छिद्र पाडून, बोळके, रिकाम्या बाटल्या आदींचा वापर करूनही ‘चिमण्यांची घरटी’ बनविता येतात. अशी घरटी गॅलरीत ठेऊन एका वाटीत धान्य आणि एका वाटीत पाणी ठेवल्यास दाणे वेचण्यासाठी हळूहळू चिमण्या येथे नियमित येतात. उन्हाळ्यात पाण्याअभावी चिमण्यांचा तडफडून मृत्यू होतो. तेव्हा गॅलरी, पोर्च, पार्किंग, कोपऱ्यात जेथे शक्य आहे, तिथे पाण्याची वाटी ठेऊन चिमण्यांना जीवदान द्या, असे आवाहनही राजन राजे यांनी केले.

आदर्श अहवाल जाहीर करून तत्काळ अंमलबजावणीची ‘धर्मराज्य पक्षा’ची मागणी

दि. २१ आदर्श अहवाल जाहीर करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करा आणि कलंकित मंत्री तसेच वशिलेबाज अधिकारी या भ्रष्टाचाऱ्यांना कडक शिक्षा करा अशी संतप्त मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी केलीय.

SONY DSC

आदर्श इमारतीतील घोटाळ्याला जबाबदार कलंकित मंत्र्यांना आणि वशिलेबाज अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आदर्श घोटाळ्यातील चौकशी अहवाल फेटाळून लावला आहे. तर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अटक करण्याची सीबीआयला परवानगी नाकारली आहे. आदर्श घोटाळ्यातील भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्याचा प्रकार संतापजनक आहे. जनतेच्या मताला आपण काडीची किंमत देत नाही हे कॉग्रेस आघाडीच्या सरकारने याद्वारे दाखवून दिले आहे. यामुळे ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कचेरीवर संतप्त निदर्शने करण्यात आल्याचं राजन राजे यांनी म्हटल.

आदर्श घोटाळ्यातील चौकशी अहवाल जाहीर करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी आणि कलंकित मंत्री तसेच वशिलेबाज अधिकारी या भ्रष्टाचाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ‘धर्मराज्य पक्षा’ने केली आहे.

error: Content is protected !!