Blog

सावित्री नदी दुर्घटनेविरोधात धर्मराज्य पक्षाचा ठाण्यात लाक्षणिक उपोषण

महाडयेथील सावित्री नदीवरील दुर्घटनेसंदर्भात प्रस्थापित व मुजोर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि कोकणवासीयांच्या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने सोमवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या उपोषणाचे नेतृत्व ठाणे लोकसभा सचिव विनोद मोरे यांनी केले. महाडच्या दुर्घटनेनंतर ठाणे खाडीवर असलेला ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने, तो जोपर्यंत सुस्थितीत आणि सुरक्षित करण्यात येत नाही, तोपर्यंत कोपरी-आनंदनगर तसेच ऐरोली पुलाजवळील टोलवसुली बंद करण्यात यावी अशीही मागणी यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’कडून करण्यात आली.
याप्रसंगी राजन राजे यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. पक्षाच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, उपाध्यक्ष राजू सावंत, खजिनदार जयेंद्र जोग, ‘धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, ठाणे लोकसभा उपाध्यक्ष सचिन शेट्टी, नरेंद्र पंडित, ठाणे विधानसभा सह-सचिव विजय भोसले, खोपट विभाग अध्यक्ष राजू शिंदे, कोपरी-आनंदनगर प्रभाग अध्यक्ष नितीन वायदंडे, संदीप सोनखेडे, नितीन उगले, रॉजर सायमन, गौरव गोरे, विकास मंडपे, सुहास बुगडे, प्रकाश डोंगरे, ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा जयश्री पंडित, महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, शिक्षक संघटनेच्या महासचिव साक्षी शिंदे, ठाणे लोकसभा महिला सचिव दर्शना पाटील आणि मयुरी वायदंडे आदी पुरुष आणि महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धर्मराज्य पक्षा’च्यावतीने रायगड जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप व विकास कामांचे उद्घाटन

‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने पोलादपूर (रायगड जिल्हा) तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या बोरघर गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नुकतेच पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन ‘धर्मराज्य पक्षा’चे महाड-पोलादपूर विधानसभा अध्यक्ष संभाजी पार्टे यांनी केले होते.
यावेळी बोरघर गावप्रमुख दगडूबुवा पार्टे, केंद्रप्रमुख श्री. कासारे सर, मुख्याध्यापक श्री. धहीवडे सर, ‘धर्मराज्य पक्षा’चे लोकमान्य नगर-४ (ठाणे) चे प्रभाग अध्यक्ष समीर गोलतकर तसेच पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोरघर ग्रामपंचायतीमधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. दरम्यान गोवेले ग्रामपंचायतीचे सरपंच किसन मोरे यांच्या हस्ते गोवेले येथे पेव्हर ब्लॉकचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी ‘धर्मराज्य शेतकरी संघटने’चे महाड-पोलादपूर विधानसभा उपाध्यक्ष भगवान साळवी, ग्रामसेवक, समस्त ग्रामस्थ आणि ‘धर्मराज्य पक्षा’चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

संविधान मोर्चातून जनतेचा हुंकार; राजन राजे म्हणाले – पर्यावरण, कामगार आणि पाण्याच्या लढ्याला ‘धर्मराज्य पक्ष’ साथ देणार

“महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या, कंत्राटी कामगारांच्या तसेच पर्यावरणाच्या मुद्यावर डॉ. सुरेश माने यांनी लढा उभारल्यास ‘धर्मराज्य पक्ष’ अखेरपर्यंत त्यांच्या सोबत असेल” असे स्पष्ट प्रतिपादन पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी आपल्या भाषणात ठामपणे केले. “आज राज्यभरात समाधानकारक पाऊस पडत असला तरी, अजूनही मराठवाडा आणि विदर्भातील बहुसंख्य गावे व शहरे तहानलेलीच आहेत आणि हे फक्त राज्य शासनानेच पाप आहे.” असा थेट आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला. ‘धर्मराज्य पक्ष’ कधीही जात-धर्म मानत नाही, असे विधान करुन राजन राजे पुढे म्हणाले, “माणसाला गुलामगिरीत वाजवणारे प्रस्थापित हे आमच्यासाठी देशद्रोही आणि धर्मद्रोहीच आहेत.” या ‘संविधान मोर्चा’ला ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाणे, नवी मुंबई, कामोठे (रायगड) येथील सर्व पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २७ जुलै रोजी पार पडलेला जिजामाता उद्यान (भायखळा) ते आझाद मैदानापर्यंतचा “संविधान मोर्चा” प्रचंड यशस्वी ठरला. जनसामान्यांना भेडसावणा-या प्रश्नांचा राज्य आणि केंद्र सरकारला जाब विचारणा-या या प्रचंड मोर्चाचे नेतृत्व ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे, ‘बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी’चे अध्यक्ष डॉ. सुरेश माने आणि ‘शिवराज्य पक्षा’चे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले.

महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी ‘धर्मराज्य पक्ष’ मैदानात; ठाणे स्टेशनबाहेर स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय लोकल ट्रेन्समध्ये महिलांसाठी राखीव असणा-या डब्यांची संख्या अपुरी असून, ती वाढवावी तसेच गर्दीच्या वेळेत कल्याण आणि डोंबिवलीप्रमाणे ठाणे ते सीएसटी ‘महिला विशेष’ लोकल सुरु करावी या प्रमुख मागण्यांसाठी, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य प्रवासी संघटने’च्यावतीने गुरुवार, दि. २१ जुलै रोजी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर नोकरदार महिलांच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती.
यावेळी महिला प्रवाशांबरोबरच पुरुष प्रवाशांनीदेखील या मोहिमेस उदंड प्रतिसाद दिला. ‘धर्मराज्य पक्षा’च्या ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा जयश्री पंडित यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या स्वाक्षरी मोहिमेत तब्बल ९५० महिला व पुरुष ठाणेकर चाकरमान्यांनी स्वाक्षरी करुन, आपला सहभाग तसेच पाठिंबा नोंदवला.
स्वाक्षरी मोहिमेच्या या कार्यक्रमात ‘धर्मराज्य महिला संघटने’च्या महाराष्ट्र राज्य सचिव स्वप्नाली पवार, शिक्षक संघटनेच्या महासचिव साक्षी शिंदे, पक्षाच्या ठाणे महिला सचिव दर्शना पाटील, कोपरी विभाग महिला अध्यक्षा भारती सावंत, प्रतिभा टपाल, कमल बागुल, मनीषा सांडभोर, मयुरी वायदंडे आदी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत, ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंडाळकर, ज्येष्ठ पत्रकार सुरेश कराळे, शिक्षक संघटनेचे सचिव प्रा.भरत जाधव, पक्षाचे खोपट विभाग अध्यक्ष सुनील घाणेकर, कोलबाड विभाग अध्यक्ष राजू शिंदे, नौपाडा विभाग अध्यक्ष दिनेश चिकणे, कोपरी-आनंदनगर प्रभाग अध्यक्ष नितीन वायदंडे,
लोकमान्य नगर प्रभाग अध्यक्ष महेश क्षीरसागर, चेंदणी-कोळीवाडा प्रभाग अध्यक्ष आनंद कोळी, नितीन उगले, रॉजर सायमन, संदीप सोनखेडे, विपुल कदम, महेश उतेकर, प्रकाश पवार, अश्वदीप भालेराव, सुधन सावंत, विलास दाभोळकर, सचिन निकम, प्रकाश डोंगरे, राजू सांडभोर, सुनील सांडभोर,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल जयश्री पंडित यांनी ‘धर्मराज्य पक्षा’च्या सर्व मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस महिला विशेष लोकल सुरू करण्यासाठी ‘धर्मराज्य पक्षा’ची स्वाक्षरी मोहीम

, , , ,

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल गाड्यांमधली गर्दी दिवसेंदिवस वाढत जात असून, त्यात महिला नोकरदार वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या अस्तित्वात असलेल्या उपनगरीय लोकल गाड्यांमधले महिलांसाठी राखीव असलेले डबे अपुरे असून, त्यांची संख्या आणखी दोन डब्यांनी वाढवावी तसेच कल्याण आणि डोंबिवलीप्रमाणे ठाणे रेल्वे स्थानकातून ‘ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस’ अशी महिला विशेष लोकल गाडी गर्दीच्या वेळेस सुरु करावी या मागणीसाठी ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य महिला संघटना’ आणि ‘धर्मराज्य प्रवासी संघटना’ यांच्यामार्फत २० आणि २१ जुलै या दोन दिवशी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती. याला ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रवासात महिलांच्या अपघातांची संख्या वाढली असून, ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि महिला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून गंभीर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून महिलांच्या डब्यांची संख्या जैसे थे अशी आहे मात्र, महिला नोकरदारवर्गाची संख्या प्रचंड वाढलेली आहे. याचा संपूर्ण ताण हा महिलांना प्रवास करताना सोसावा लागत आहे. शिक्षणात आणि नोकरीमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण असले तरी, उपनगरीय रेल्वे लोकलच्या माध्यमातून सातत्याने घडत असलेल्या अपघातांपासून महिलांना संरक्षण कधी मिळणार ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’च्यावतीने ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधक आणि मध्य रेल्वेचे मुख्य प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले आहे.

दि. २० आणि २१ जुलै या दोन दिवशी ‘धर्मराज्य प्रवासी संघटने’च्यावतीने ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही ठिकाणी प्रवाशांमार्फत स्वाक्षरी मोहीम राबवली होती. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला असून, उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांची संख्या वाढवावी तसेच ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी महिला विशेष लोकल गाडी गर्दीच्या वेळेत सुरु करावी, अशी मागणी या स्वाक्षरी मोहीमेच्यावेळी करण्यात आली. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव रामभाऊ कोंढाळकर, महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा अध्यक्षा जयश्री पंडित, सहसचिव दर्शना पाटील ठाणे लोकसभा उपाध्यक्ष नरेंद्र पंडित, बेलापूर विधानसभा अध्यक्ष निवास साळुंखे, धर्मराज्य शिक्षक-शिक्षकेतर संघटनेच्या महासचिव साक्षी शिंदे, सचिव भरत जाधव, नवी मुंबई शहर महिला अध्यक्षा शितल कोळी, उपाध्यक्षा रेखा साळुंखे, पोर्णिमा सातपुते, उज्ज्वला जाधव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धर्मराज्यपक्षातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

‘धर्मराज्य पक्ष’ ऐरोली विधानसभा, प्रभाग क्र. ४ च्यावतीने गुरुवार, दि. ३० जून रोजी १०वी आणि १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा’ विष्णूनगर, दिघा (नवी मुंबई) येथे आयोजित करण्यात आला होता. ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष मा. श्री. राजू सावंत, शिक्षक संघटनेच्या महासचिव साक्षी शिंदे, महासचिव मा. श्री. रामभाऊ कोंडाळकर पक्षाच्या आणि महिला सचिव दर्शना पाटीलयांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पक्षाचे भिवंडी विधानसभा अध्यक्ष भरत हलपतराव, विदर्भ संपर्कप्रमुख विजय नांदूरकर, महाड-पोलादपूर विधानसभा अध्यक्ष संभाजी पार्टे, ऐरोली विधानसभा उपाध्यक्ष मंगेश पिंगळे, ऐरोली विधानसभा सहसचिव रत्नदीप कांबळे, सिद्देश सावंत ऐरोली विधान सभा सचिव युवा कार्यकर्ते नितीन उगले आदी मान्यवर उपस्थित होते. या गुणगौरव सोहळ्यात दिघा-ऐरोली परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसोबत मोठया संख्येने उपस्थिती लावली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग क्र. ४ चे अध्यक्ष गणेश पोटभरे, उप-अध्यक्ष आकाश पाईकराव, तसेच रवी नाईक, किशोर शिरोळे, शेखर गायकवाड, फ्रान्सिस, मनोरमा मोरे, नरेश सरकन्य इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. या गुणगौरव सोहळ्याला ऐरोली विधानसभा क्षेत्रातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

समाजातील चांगल्या लोकांमुळेच बदल शक्य ! कामोठयातील प्रकल्पग्रस्तांच्या सभेत राजन राजेंचे प्रतिपादन

सामाजिक आणि राजकीय बदल घडवायचा असेल तर, आपल्या समाजातील चांगल्या लोकांनी पुढे येऊन सत्ता ताब्यात घेतल्यास बदल शक्य असल्याचे स्पष्ट प्रतिपादन `धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी कामोठे येथील जाहीर सभेत बोलतांना केले. कामोठे येथील `धर्मराज्य पक्ष’प्रणित `स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटने’ने आयोजित केलेल्या या जाहीर सभेत पनवेल आणि परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. जुई-कामोठे-नौपाडा या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन बुधवार, दि. १५ जून रोजी कराडी समाज हॉल, कामोठे येथे ही सभा आयोजित केली होती.
दरम्यान, प्रकल्पग्रस्त शेतक-यांना संबोधित करतांना राजन राजे म्हणाले की, ’संपूर्ण रायगड जिल्ह्यात दि. बा. पाटील यांच्यानंतर एकही प्रभावी नेता नंतरच्या काळात निर्माण न झाल्यामुळेच दुर्दैवाने आपल्या समाजाची आज दुरवस्था झाली आहे आणि म्हणूनच सामाजिक क्रांती तसेच राजकीय बदल घडवायचा असेल तर समाजातील चांगल्या लोकांनी पुढे येऊन सत्ताधीश झालेच पाहिज“ अशा शब्दांत राजन राजे यांनी आपली रोखठोक मतं व्यक्त केली. त्यानंतर `धर्मराज्य महिला संघटने’च्या मावळ लोकसभा अध्यक्षा शोभना म्हात्रे, `धर्मराज्य पक्षा’चे महासचिव राम कोंडाळकर, नव-नियुक्त पनवेल अध्यक्ष गोपीनाथ भगत, पनवेल तालुका युवक अध्यक्ष सुमित गोवारी,पनवेल सचिव भाऊ म्हात्रे, कामोठे शहर अध्यक्ष रत्नाकर गोवारी, कामोठे शहर सचिव परशुराम म्हात्रे, अड . विजय कुर्ले, ज्येष्ठ पत्रकार सुरेश कराले, कामोठे गावचे माजी सरपंच विठोबा म्हात्रे आदींनी आपली मते व्यक्त केली.
यादरम्यान, पनवेल आणि कामोठे शहरांमध्ये येणारा नैना प्रकल्प, कामोठे ग्रामपंचायतीचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याचा प्रस्ताव, प्रस्तावित महानगरपालिकेत समाविष्ट होणारा गावठाण विस्तार तसेच प्रकल्पग्रस्तांच्या उर्वरित राहिलेल्या मागण्या इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पनवेल शहर अध्यक्ष म्हणून गोपिनाथ भगत, उपाध्यक्ष संतोष गोवारी, सचिव भाऊ म्हात्रे, पनवेल तालुका युवक अध्यक्ष सुमित गोवारी, उपाध्यक्ष सागर म्हात्रे, सचिव सचिन गोवारी, कामोठे शहर अध्यक्ष रत्नाकर गोवारी, उपाध्यक्ष रमाकांत गोवारी, सचिव परशुराम अंबाजी म्हात्रे, कामोठे गाव अध्यक्ष गणेश नाईक, उपाध्यक्ष राजू म्हात्रे, सचिव महेंद्र म्हात्रे, जुई गाव अध्यक्ष चंद्रकांत चिमणे, उपाध्यक्ष अमृत कडू, सचिव स्वामी म्हात्रे आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

ठामपातील बेसुमार वृक्षतोडीविरोधात `धर्मराज्य पक्षा’ ची निदर्शने

रस्तारूंदीकरण आणि शहरीकरणाच्या नावाखाली ठाणे महानगरपालिकेने सध्या शहरातील नौपाडा, वर्तकनगर आणि पोखरण रोडवरील डेरेदार वृक्ष निर्दयीपणे कापायला सुरूवात केली आहे. एकाअर्था, ठामपा पुरस्कृत निसर्ग आणि पर्यावरणाचा खून पाडण्याचं कार्य महापालिका प्रशासनानं हाती घेतलेलं असून, त्याचाच निषेध करण्यासाठी `धर्मराज्य पक्षा’च्यावतीने शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ `वसुंधरा दिना’च्या पार्श्वभूमीवर तीव्र निदर्शने करण्यात आली. ठाणे शहराला लाभलेला निसर्गाचा समृध्द वारसा यानिमित्ताने नष्ट होण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप यावेळी `धर्मराज्य पक्षा’ने ठाणे महापालिका प्रशासनावर केला आहे.
दरम्यान, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहर विकासाच्या आणि रस्तारूंदीकरणाच्या आड येणारी अनधिकृत बांधकामे तोडण्यास धुमधडाक्यात सुरूवात केली आहे. आयुक्तांच्या या धडाडीचे ठाणेकर नागरिकांनी कौतुक केले असले; तरी, बेसुमार वृक्षतोडीमुळे नागरिक नाराज झालेले आहेत. नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनी विभागात सध्या प्रस्तावित उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असून, त्यासाठी संपूर्ण महात्मा गांधी रस्त्यावरील झाडांच्या कत्तली झाल्या आहेत. मुळात याठिकाणी उड्डाणपूलाची आवश्यकता नसतांना तो उभारण्याचा घाट कुणाला खूष करण्यासाठी घातला जातोय? असा सवालदेखील `धर्मराज्य पक्षा’ने यावेळी उपस्थित केला आहे. याप्रसंगी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष सचिन शेट्टी, नरेंद्र पंडित, धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे महासचिव महेशसिंग ठाकूर, धर्मराज्य महिला संघटनेच्या समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा अध्यक्षा जयश्री पंडित, नवी मुंबई शहर उपाध्यक्षा रेखा साळूंखे, दर्शना पाटील, गिता पाटील, उज्ज्वला जाधव, पोर्णिमा सातपुते, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ सलगर, सहसचिव दिनेश चिकणे, प्रभाग क्र. ४७ चे प्रभाग अध्यक्ष समीर कालगुडे, प्रभाग क्र. 24 चे प्रभाग अध्यक्ष राजू शिंदे, डोंबिवली शहर अध्यक्ष जगदीश जाधव, ठाणे शहर माहिती अधिकार कक्ष प्रमुख अनिल महाडिक, बेलापूर विधानसभा अध्यक्ष निवास साळुंखे, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्ष प्रा. भरत जाधव, प्रकाश पवार, दिपक देशपांडे, युवा कार्यकर्ता संदीप सोनखेडे, अमित लिबे, मनोज बेर्डे, गंभीर आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

लक्ष्मीनारायण यांच्या बदलीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’चा निषेध मोर्चा आणि निदर्शने

, , ,

ठाण्याचे मावळते सह-पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या बदलीविरोधात ‘धर्मराज्य पक्षा’ने शुक्रवारी एका निशेध मोर्चाचे आयोजन केले होते. प्रामाणिक आणि कर्तव्यकठोर अशी ओळख असलेले लक्ष्मीनारायण यांनी आपल्या कार्यकाळात ठाण्यातील समाजकंटकांवर व भ्रष्ट राजकारण्यांवर चांगलाच वचक ठेवला होता. सूरज परमार आत्महत्या प्रकरणाचा तपासदेखील त्यांच्याच देखरेखीखाली सुरू असल्याने, परमारप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी नगरसेवकांचा पाय अधिकाधिक खोलात गेला होता. यामुळे लक्ष्मीनारायण हे सत्ताधारी आणि विरोधकांचा मुख्य अडसर ठरू पाहात होते. म्हणूनच राजकीय दबावापोटी बढतीच्या नावाखाली मुंबईतील पोलिस मुख्यालयात (अडगळीच्या ठिकाणी) अतिरिक्त महासंचालक (प्रशासन) पदी बदली करून, महाराष्ट्र शासनाने एका कर्तबगार ‘अॅक्शनबाज’ अधिका-याला ‘अॅक्शनबाद’;”kick up & kick out” केल्याच्या निशेधार्थ ‘धर्मराज्य पक्षा’ने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक निशेध मोर्चा काढला होता.

दरम्यान, चंदनवाडीतील रायगड गल्ली येथून सुरू झालेला हा निशेध मोर्चा ठाणे महापालिकेवरून गोखले रोड मार्गे नौपाडा परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे षेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित होते. बांधकाम व्यवसायिक सूरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांना मानसिक त्रास देणा-या ठाणे महानगरपालिकेतील नगरसेवकांची नावे नोंद केली होती. त्यानंतर ठामपातील चार नगरसेवकांना अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास लक्ष्मीनारायण यांच्याकडे असल्याने, ठाण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली होती. शेवटी राजकीय दबावाचा वापर झाल्याने महाराश्ट्र शासनाने बढतीच्या बहाण्याने ठाणेकर नागरिकांचे आधारस्तंभ ठरलेल्या व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांची उचलबांगडी करीत मुंबईतील पोलिस मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक (प्रषासन) म्हणून बदली केली आणि परमार आत्महत्येप्रकरणाचा गतिमान झालेला तपास संथ करण्याचे महापाप केले.

व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे ठाणेकरांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त होत असतानाच ‘धर्मराज्य पक्षा’ने १२,१३,१४ जानेवारी या तीन दिवसात ठाण्याच्या विविध भागात स्वाक्षरी मोहिम राबवून लक्ष्मीनारायण यांच्या बदलीला विरोध दर्षविला. हजारो ठाणेकरांनीदेखील या बदलीचा निषेध करून स्वाक्षरी मोहीमेला उदंड प्रतिसाद दिला. या दरम्यान, ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांना पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन, लक्ष्मीनारायण यांच्या राजकीय हस्तक्षेपातून झालेल्या बदलीचा निशेध केला. ‘धर्मराज्य पक्षा’च्या मोर्चाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर ठाणे रेल्वे

स्थानक परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांची बदली म्हणजे निव्वळ राजकीय हेतूने झालेली असून, ठाण्यातील सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूच्या राजकारण्यांची मिलीभगत असल्याचा थेट आरोप पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी प्रसिध्दीमाध्यमांषी बोलतांना केला. एका ‘अॅक्शनबाज’ अधिका-याल ‘अॅक्शनबाद’ करून भारतीय जनता पक्ष राश्ट्रवादी काॅंगे्रसला आपल्या दबावाखाली आणत असल्याचे विधान त्यांनी यावेळी बोलतांना केले. सज्जनतेचा आव आणून ‘‘लक्ष्मीनारायण’’ यांची बदली रद्द करण्यासाठी, स्वपक्षीय मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचे ‘नाटक’ करणा-या, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी या बदलीप्रकरणी, आमदारकीचा ‘राजीनामा’ देवून आपल्या प्रामाणिकतेचा प्रत्यय द्यावा… अन्यथा, ठाणेकरांना उल्लू बनवू पाहणारी आपली राजकीय-नौटंकी बंद करावी, असे आव्हान दिले.

टीव्ही 9 वर झालेल्या एका परिसंवादाचा उल्लेख करत, ‘‘राम कदम नावाचा एक राजकीय दलाल, यावेळी लक्ष्मीनारायण यांच्या बदलीचे समर्थन करीत होता’’. या अशाच प्रवृत्तीमुळे देशात, महाराश्ट्रात राजकारण बदनाम झालयं. आम्हाला फक्त पाच किंवा दहा चांगले राजकारणी दाखवा, आम्ही ‘धर्मराज्य पक्षा’चे राजकारण बंद करून टाकतो’’, असे रोखठोक विधान करून, आमचे आजचे आंदोलन हे व्यक्तिसापेक्ष नसून, नीतिभ्रष्ट प्रवृत्तीविरूध्द असल्याचे पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी आपल्या भाषणात स्पश्ट केले.

याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे महासचिव राम कोंढाळकर, उपाध्यक्ष राजू सावंत, अण्णा साळुंखे, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सदस्य मधुकर पवार, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, सचिव विनोद मोरे, उपाध्यक्ष नरेंद्र पंडित, सचिन शेट्टी, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जगन्नाथ सलगर, सचिव चंदू येरूणकर, सहसचिव विजय भोसले, दिनेश चिकणे, माहिती अधिकार ठाणे शहर कक्षप्रमुख अनिल महाडिक, धर्मराज्य महिला संघटनेच्या अध्यक्षा जयश्री पंडित, सचिव साक्षी शिंदे, सहसचिव दर्शना पाटील, सदस्या वैशाली भवालकर, पौर्णिमा सातपुते, उज्वला जाधव, सोनम तारकर, मिनल मल्या, नवीमुंबई शहर अध्यक्षा शितल कोळी, उपाध्यक्षा रेखा साळुंखे, शिक्षक संघटनेचे सहसचिव प्रा. भरत जाधव, प्रभाग अध्यक्ष महेश क्षिरसागर, बेलापूर विधानसभा अध्यक्ष निवास साळुंखे, कामोठ्याचे सुमित गोवारी, सागर म्हात्रे, ऐरोली विधानसभा अध्यक्ष पांडूरंग गोरे, सचिव सिध्देश सावंत, युवा अध्यक्ष संतोष काजारे, भिवंडी लोकसभा अध्यक्ष भरत हलपतराव, मुरबाड विधानसभा अध्यक्ष नरेश रसाळ आदी मान्यवर तसेच, इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात रक्तदान शिबीर संपन्न

, , , , ,

‘‘धर्मराज्य पक्ष’’ व ‘‘सिव्हील रूग्णालय, ठाणे’’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे खोपट विभागतर्फे ‘रक्तदान शिबीर’ संपन्न झाले. या शिबीरात ऐच्छिक ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सिव्हील रूग्णालयाचे डाॅ. मनोजकुमार मोहन, शिल्पा कुलकर्णी (स्टाफ नर्स), अमृत झोमरे (टेक्निशिएन), रूपाली कदम (टेक्निकल सुपरवायझर), पल्लवी कैतकर (पी.आर.ओ.), दया सुतार (स्टुडन्ट नर्स), कोमल हुंडारे (स्टुडन्ट नर्स), वत्सला राठोड (अटेन्डन्ट), राधा मखवाना (अटेन्डन्ट), उमेश वाघचैरे (ब्लड आॅन काॅल बाॅय) यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदानपूर्वी तपासण्या व रक्तदान घेण्यात आले. यावेळी ऐच्छिक ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना ‘सिव्हील रूग्णालया’तर्फे रक्तदान कार्ड व प्रमाणपत्र देण्यात आले. सदर ‘रक्तदान शिबीर’ रविवार, दि. ८ फेब्रुवारी-२०१५ रोजी, सकाळी १०.०० ते दुपारी २.०० यावेळेत संपन्न झाले.

या शिबीराचे आयोजन ‘धर्मराज्य पक्षा’चे ठाण्यातील खोपट प्रभागातर्फे प्रभाग अध्यक्ष राजू षिंदे व उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष सुनिल घाणेकर यांनी केले होते. यावेळी ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे, महासचिव राजू फणसे, उपाध्यक्ष नितीन देषपांडे, ‘धर्मराज्य महिला संघटना’ अध्यक्षा जयश्री पंडित, ठाणे जिल्हा समन्वयक राजेश गडकर, ठाणे जिल्हा सचिव नरेंद्र पंडित, ठाणे शहर अध्यक्ष सचिन शेट्टी, ठाणे शहर सचिव समीर चव्हाण, सहसचिव विजय भोसले, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे महासचिव महेषसिंग ठाकूर, सचिव रूपेष पवार  आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!