भविष्यात ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी, “ईव्हीएम हटाव… देश बचाव… बॅलेट-पेपर लाव” या घोषणेखाली, मतपत्रिकेद्वारे निवडणुकांसाठीची लोकचळवळ सुरु करण्यात आली असून, दि. १४ डिसेंबर-२०२४ रोजी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील, मुंबई मराठी पत्रकार संघ येथे, एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला निवृत्त न्यायमूर्ती मा. बी.जी. कोळसे-पाटील, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे, डाव्या चळवळीतील नेते मा. फिरोज मिठीबोरवाला, आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. धनंजय शिंदे, मा. मेहमूद प्राचा, प्रा. अमित उपाध्याय आणि विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर, अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या मरकडवाडी गावचे सरपंच मा. रणजित मरकड आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत सर्व समविचारी पक्ष आणि सामाजिक संस्था/संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी, ‘ईव्हीएम’विरोधी लोकचळवळ, यापुढे आक्रमकपणे सुरु ठेवत, मतपत्रिकेद्वारे निवडणुका पार पाडण्यासाठी, मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. या बैठकीचे आयोजन अमीन सोलकर, शरद कदम, संतोष आंबेकर, एम.ए. खालिद यांनी केले होते. दरम्यान, मतपत्रिकेवरील मतदानाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी, ‘प्रजासत्ताक दिना’चे औचित्य साधून, दि. २६ जानेवारी-२०२५ रोजी, रात्रौ ठीक ९ वाजता, फक्त ५ मिनिटांसाठी आपल्या घरातील, कार्यालयातील व जिथे जिथे शक्य असेल त्या ठिकाणचे, लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध नोंदविण्याचे विनम्र आवाहन मा. राजन राजे यांनी उपस्थित मान्यवरांना केले.
रविवार, दि. २६ जानेवारी-२०२५ रोजी, भारताच्या अमृतमहोत्सवी-प्रजासत्ताकदिनी, रात्री ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी आपापल्या घरातील अथवा इतर ठिकाणचे लाईट्स बंद ठेवून, ‘EVM’चा प्रतिकात्मक; पण, तीव्र निषेध व्यक्त करण्याचे विनम्र आवाहन ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष मा. राजन राजे यांच्यावतीने करण्यात आले आहे…!!!”
भाजप व त्यांची ‘महायुती’ (NDA) सत्तेवर आल्यानंतर, असं काही घडलं आणि घडत गेलं की, भारतीय जनतेचा ईव्हीएम (EVM) वरील विश्वास उडत गेला व आजमितीस तो पूर्णतया उडाल्यानेच, पुन्हा ‘कागदी-मतपत्रिकेवरील’ (Paper-Ballot) मतदानाची मागणी भारतभरातून व्हायला लागलीय…त्याच अनुरोधाने धर्मराज्य पक्ष, या “EVM हटाव… लोकतंत्र बचाव” मोहिमेत हिरिरीने उतरला असून, “आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम (EVM)’ऐवजी मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात” यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, दि. १० डिसेंबर-२०२४च्या ‘विश्वमानव-दिवस’ किंवा ‘जागतिक मानवी-हक्क दिना’चं औचित्य साधत निवडणूक-प्रक्रियेसंबंधाने (EVM हवं की, BALLOT-PAPER…???) अशी ठाणेकरांची ‘जनमत-चाचणी’ मोहीम सुरु करण्यात आलेली असून, त्याचाच भाग म्हणून बुधवार, दि. ११/१२/२०२४ रोजी…”EVM हवं की, BALLOT-PAPER” यासाठी, कागदी-मतपत्रिकेद्वारे वर्तकनगर भागातील जनतेचं ‘सार्वमत’ संध्याकाळी ४ वा. पासून ते रात्रौ ८ वा. पर्यंत, वर्तकनगर नाका, (सह्याद्री मेडिकल स्टोअर्सजवळ) ठाणे (प) येथे घेण्यात आले.
यादरम्यान, २६ जानेवारी-२०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं निमित्त साधून ठीक ९ वाजता फक्त, पाच मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या घरातले अथवा कार्यालयातले लाईट्स बंद ठेवून…‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहनदेखील ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने करण्यात आहे.मतपत्रिकेद्वारे निवडणुकीसाठी ‘धर्मराज्य पक्ष’ आक्रमक…
ईव्हीएम, धर्मराज्य पक्ष, बॅलेट पेपर....नो इलेक्शन, मतपत्रिका, राजन राजे
१९४७ पूर्वी आपण स्वातंत्र्याची पहिली लढाई लढलो, आता मिळालेलं स्वातंत्र्य आपल्याला वाचवायचे असेल तर, मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही. त्यानंतर, भाजपाला अगदी दोन तृतीयांश जरी मतं मिळाली तरी, आमची हरकत नाही; मात्र, अशी बनावटगिरी आणि भोंदुगिरी आम्ही यापुढे खपवून घेणार नाही. आमच्या जनमताचा अनादर चालवून न घेण्यासाठीच ‘धर्मराज्य पक्षा’ने नो “बॅलेट पेपर… नो इलेक्शन” या घोषणेखाली, स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरु केली असल्याचे उद्गार पक्षाध्यक्ष राजन राजे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना काढले. आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात यासाठी, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली असून, ठाणे शहराच्या विविध भागात राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे राजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान पत्रकार परिषदेनंतर, लगेचच ठाणे रेल्वे स्थानक परिसरात घेण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी आपले मत नोंदवले. या जनजागृती मोहिमेअंतर्गत, पक्षाच्या वतीने मतपेटी तयार करण्यात आली असून, त्यात नागरिकांकडून आपले मत कोणाला… ईव्हीए की, मतपत्रिकेला? यासाठी प्रतीकात्मक मतदान घेण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात, भाजपा-महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. जर, त्यांचा विजय इतकाच “न भूतो” व ऐतिहासिक होता; तर, त्यांच्या तथाकथित कार्यकर्त्यांखेरीज, रस्तोरस्ती सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त आनंदोत्सव का दिसला नाही? असा परखड सवाल उपस्थित करुन, ही तर सर्वसामान्य जनतेच्या मतांची थेट चोरी असून, आपली फसवणूक होतेय आणि हीच फसवणूक भविष्यात पुन्हा होऊ द्यायची नसेल तर, दिलीश्वरांना आणि गुजराथी लॉबीला धडका देण्यासाठी ईव्हीएम मशीन अरबी समुद्रात फेकून देण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा जोरदार घणाघात राजन राजे यांनी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यावेळी पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले की, यासंदर्भात आम्ही विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांना भेटून, ही संकल्पना त्यांच्या गळी उतरवणार आहोत. ज्यांना पटेल ते आमच्यासोबत येतील, न पेक्षा आम्ही “एकला चालो रे” याप्रमाणे, भारतीय स्वातंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने जपणूक करण्यासाठी अधिक आक्रमकपणे ‘ईव्हीएम’ला प्राणपणाने विरोध करु. “नो बॅलेट पेपर… नो इलेक्शन” ही आमची घोषणा असून, मतपत्रिकेवरील मतदानाचा हक्क पुन्हा मिळवण्यासाठी, येत्या २६ जानेवारी-२०२५ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त, रात्री ठीक ९ वाजता, फक्त पाच मिनिटांसाठी सर्वांनी आपल्या घरातले अथवा कार्यालयातले लाईट्स बंद ठेवून, ‘ईव्हीएम’वरील मतदानाचा तीव्र निषेध व्यक्त करण्याचे आवाहनदेखील राजन राजे यांनी यावेळी केले. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय, देशातील नागरिकांची अत्यंत लाजिरवाणी व क्रूर चेष्टा करतायेत. दिलेली मतं ‘ईव्हीएम’मध्ये दीडत नव्हती म्हणून, ‘व्हीव्हीपॅट’ आणलं; परंतु, मतं मोजली कुठली? तर, ‘ईव्हीएम’मध्ये न दिसणारी. मतपत्रिका मोजणे हे, एव्हरेस्ट शिखर चढण्याएवढे किंवा एखादा भलामोठा डोंगर खोदण्याएवढे अवघड काम आहे का? असा थेट प्रश्नदेखील राजन राजे यांनी यावेळी उपस्थित केला. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे, राज्यघटनेचे रक्षक असताना, ही न्यायपीठे मात्र, सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालची मांजरं झालीयेत, अशी जोरदार टीकादेखील ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी शेवटी पत्रकार परिषदेत केली.‘धर्मराज्य पक्षा’चा १३वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष अशी सर्वमान्य ओळख असलेला आणि कामगार-कष्टकरीवर्गाचा बुलंद आवाज असणाऱ्या ‘धर्मराज्य पक्षा’चा १३वा वर्धापनदिन, दि. १६ नोव्हेंबर-२०२४ रोजी, पक्षाच्या ठाणे कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वर्धापनदिनाचे औचित्य साधून, ‘धर्मराज्य दिनदर्शिका-२०२५’ या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशनदेखील राजन राजे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही तासांवर येवून ठेपलेल्या असताना, उपस्थित पदाधिकारी-कार्यकर्त्यांना संबोधित करताना राजन राजे म्हणाले की, गेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये, भाजपला निसटता विजय मिळालेला असल्यामुळे, त्यांचा ‘चारशे पार’चा बार फुसका निघालेला आहे. मोदी-शहा यांच्या रासवट-राजकीय प्रवृत्तीविरोधात, भारतीय जनतेमध्ये उसळलेला जनक्षोभ उसळल्यामुळेच भाजपला त्यांची जागा दाखविण्यात काही अंशी यश आलेले असले तरी, येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, महायुती सरकारला राज्यातून संपूर्ण नेस्तनाबूत करावेच लागणार आहे. ज्यापद्धतीने भारतीय जनता पक्षाने, शिवसेनेचे ४० आमदार फोडून, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाच्या नावाखाली आपले ‘मिंधे’ बनवून, उद्धवजींच्या पाठीत खंजीर खुपसला, हा महाराष्ट्रद्रोही आणि महाराष्ट्रधर्म बुडविणाऱ्या गद्दारांना, आपल्या ताटाखालची पोकळ सत्ताधारी मांजरं बनविणाऱ्या ‘गुजराथी-लॉबी’नेच घडविलेला हा, संतापजनक आणि अश्लाघ्य प्रकार असल्यामुळेच, निव्वळ महाराष्ट्रहित जोपासण्यासाठी व महाराष्ट्रधर्म राखण्यासाठीच, ‘धर्मराज्य पक्षा’ने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला पाठींबा दिला असल्याचे राजन राजे यांनी यावेळी स्पष्ट केले. मालवणात शिवरायांचा तकलादू पुतळा उभारुन, समस्त मराठी जनतेच्या अस्मितेच्या केलेल्या, घनघोर श्रेणीतल्या अपमानाचा सूड, येत्या विधानसभा निवडणुकांच्या निकालात, जनता-जानार्दनाकडून नक्कीच उगवला जाईल, असा प्रखर आशावाद ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी यावेळी बोलून दाखवला. दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’च्या १३व्या वर्धापनदिनाच्या या कार्यक्रमाप्रसंगी पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे, सचिव जयेंद्र जोग, सहसचिव नरेंद्र पंडित, खजिनदार अजित सावंत, ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश गडकर, उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर, सचिन शेट्टी, ठाणे लोकसभा सचिव विनोद मोरे यांच्यासह, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, सचिव समीर चव्हाण; तसेच, पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि कामगार संघटनेचे कामगार सदस्य व कामगार युनिट प्रतिनिधी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

वाल्मेट इंडिया प्रा. लि. (फ्लो कंट्रोल युनिट) या आस्थापनेच्या, डोंबिवली-अंबरनाथ एमआयडीसी या दोन्ही युनिटमधील, कामगार सदस्यांच्या पगारवाढीच्या त्रैवार्षिक कराराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त
‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’ची युनियन असलेल्या वाल्मेट इंडिया प्रा. लि. (फ्लो कंट्रोल युनिट) या आस्थापनेच्या, डोंबिवली एमआयडीसी आणि अंबरनाथ एमआयडीसी या दोन्ही युनिटमधील, कामगार सदस्यांच्या पगारवाढीच्या त्रैवार्षिक कराराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त, डोंबिवली (पू.) येथील ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल येथे येथे, वाल्मेट युनियन युनिटच्या वतीने रविवार, दि. ६ ऑक्टोबर-२०२४ रोजी, एका स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘धर्मराज्य पक्ष’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे संस्थापक/अध्यक्ष मा. राजन राजे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वाल्मेट इंडिया प्रा. लि. (फ्लो कंट्रोल युनिट) या आस्थापनेतील कामगारांनी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर, वर्षभरातच मा. राजन राजे यांच्या सक्षम व प्रखर नेतृत्त्वाखाली, पगारवाढीचा पहिलावहिला त्रैवार्षिक करार यशस्वीपणे संपन्न झाला होता. याच कराराच्या वर्षपूर्तीनिमित्त, या दिमाखदार स्नेहसंमेलनाचे आयोजित करण्यात आले

होते. यावेळी कामगार सदस्यांच्या वतीने मा. राजन राजे यांना शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देतानाच, शिवछत्रपती महाराजांचे स्मृतिचिन्ह प्रदान करुन, त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे उपाध्यक्ष श्री. रमाकांत नेवरेकर, महासचिव श्री. महेशसिंग ठाकूर, सचिव श्री. समीर चव्हाण, धर्मराज्य पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. स्नेहसंमेलनाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, श्री. कमलेश कोल्हे, श्री. अविनाश बढे, श्री. लोटन येलवे, श्री. संदीप पवार, श्री. मिलिंद जोशी, श्री. निलेश जगताप, श्री. सुभाष देशमुख, श्री. लक्ष्मण शिंदे या युनिट कार्यकारिणी सभासदांसह, ‘वाल्मेट’च्या डोंबिवली आणि अंबरनाथ आस्थापनेतील कामगार सदस्य मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईसाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने निषेध आंदोलन
आंदोलन, ठाणे, धर्मराज्य पक्ष, महाराष्ट्र
बदलापूर येथील ‘आदर्श विद्यामंदिर’ या शाळेतील दोन चिमुरड्या बालिकांवर, शाळेचा सफाई कर्मचाऱ्याने नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर, बदलापूर शहरात मोठा जनक्षोभ उसळला होता. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक पोलीस प्रशासनाने शाळा प्रशासनाला पाठीशी घालण्याचा प्रकार समोर आल्यावर, या संपूर्ण घटनाक्रमात राजकीय हस्तक्षेप झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी चालढकल करुन, गुन्हेगारांना पाठीशी घातले गेले असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित होत असल्याने, दोषींवर ताबडतोब कठोर-कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने गुरुवार दि. २२ ऑगस्ट-२०२४ रोजी, पक्षाध्यक्ष मा. राजन राजे यांच्या नेतृत्त्वाखाली, सायंकाळी ४:०० वा.पासून ते सायंकाळी ५:०० वा.पर्यंत, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, शासकीय विश्रागृहाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले.

राजन राजे लिखित, ‘इंडिया एक आयडिया’ पुस्तिकेचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते दिमाखदार प्रकाशन.
इंडिया आघाडी, इंडिया एक आयडिया, उद्धव ठाकरे, लोकसभा निवडणूक-२०२४
“लोकसभा निवडणुकीनंतर, या संपूर्ण भारतातील सगळ्यात महत्त्वाची निवडणूक कुठली असेल तर, ती आता येऊ घातलेली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणूक तुम्ही-आम्ही पाहिली, ‘इंडिया आघाडी’ म्हणून आपण सगळे एकत्र लढलो. त्यावेळी या सगळ्यांच्या कानाजवळून तीर गेला. इलेक्टोरल बाँड, इलेक्शन कमिशन आणि इडी या सगळ्यांच्या मेहेरबानीमुळे ते फक्त धाराशाही झाले नाहीत, थोडक्यात वाचले; पण, त्यांची लाज गेली. एवढं सगळं करुन आज सगळे राजकीय तज्ज्ञ सांगतायेत की, सत्तर ते ऐंशी जागा यांनी लाटलेल्या आहेत आणि आता, ‘अबकी बार मोदी सरकार’ म्हणणाऱ्यांचा अहंकार धुळीला मिळाला. पण, ते संपलेत असं नव्हे. आपल्याला हे विसरुन चालणार नाही की, या ठाण्यातून दगाफटका झालेला आहे. ठाण्यातूनच सुरत ते गुवाहाटी असं गलिच्छ राजकारण झालेय. काळ्या पैशांतून आमदार विकत घेतले गेले. ज्याला आपण खोके सरकार म्हणतो, आजही घटनात्मकदृष्ट्या ते बेकायदेशीर आहे. तत्कालीन राज्यपालांचा कारभारही बेकायदेशीरच होता. त्यामुळे ज्या गद्दारीची सुरुवात ठाण्यातून झाली, त्या गद्दारांची तटबंदी येत्या विधानसभा निवडणुकीत ठाण्यातूनच सर्वप्रथम उध्वस्त करा!” असा जोरदार घणाघात करीत, ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, ठाण्यातील शिवसैनिकांना साद घातली. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात ‘भगवा-सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, दि. १० ऑगस्ट-२०२४ रोजी, सायंकाळी ७ वा. घेण्यात आलेल्या सभेत, राजन राजे बोलत होते. यावेळी आपल्या धडाकेबाज भाषणातून, उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधताना राजे पुढे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रधर्माचा आणि या संपूर्ण सज्जनशक्तीचा, या गद्दारांकडून जो काही अवमान करण्यात आलाय, तो आपल्याला विसरून चालणार नाही. यानिमित्ताने मला आपल्याला एवढंच सांगायचंय, ज्या महाशक्तीच्या इशाऱ्यावर या लोकांनी उद्धवजींचं सरकार पाडलं, त्यांना धडा शिकवायची वेळ आता आलेली आहे आणि ही संधी विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला गमावून चालणार नाही. ज्याप्रकारे महाभारतात दुर्योधन आणि दु:शासनाच्या इशाऱ्यावर शकुनी फासे टाकत होता, त्याचपद्धतीने इथे गलिच्छ राजकारणाचे फासे टाकले गेले. इथे मला आवर्जून सांगायचंय की, उद्धवजी ठाकरे महाराष्ट्रात आणि भारतात राहुलजी गांधी हे जे कोदंडधारी धनुष्य हातात घेऊन उभे आहेत, त्यांच्या धनुष्यातून असे शकुनीचे फासे फेकले जात नाहीत तर, त्यांच्या धनुष्यातून तीक्ष्ण बाण रोरावत बाहेर पडतात. ते रामबाण आहेत, अशा शब्दांत राजन राजे यांनी, शिवसैनिकांमध्ये स्फुल्लिंग चेतवले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, जे काही सलग १८ लेख लिहिले होते, त्या लेखांचा संग्रह असलेल्या ‘इंडिया एक आयडिया’ या पुस्तिकेचं प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते दिमाखात संपन्न झाले. यावेळी गडकरी रंगयातनमध्ये उपस्थित असलेल्या हजारो शिवसैनिकांना या पुस्तिकेचं वाटप करण्यात आले. आगामी विधानसभा विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने, या पुस्तिकेतील प्रासंगिक मुद्द्यांचा संदर्भ घेत, लोकांशी बोलताना, भाषणं करताना आणि मतदारांशी संपर्क साधताना, त्यातील लेख मार्गदर्शक ठरतील, असा आशावाद राजन राजे यांनी, शेवटी बोलून दाखवला.

नवी मुंबईस्थित (Rabale TTC) ‘प्रोटेगो इंडिया’ या, जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीत…’धर्मराज्य पक्ष’प्रणित “धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा”चा…अगदी टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीतही कामगारांमध्ये सनसनाटी व थरार पैदा करणारा करार!

केंद्र सरकारच्या लोकशाहीविरोधी कृतीबाबत ‘धर्मराज्य पक्षा’ची ठाण्यात मूकनिदर्शने.
रबाळे एमआयडीसीतील ‘हिवा इंडिया’ कंपनीतील २४२ कामगारांना तब्बल १४,५०० रुपयांची भरघोस पगारवाढ…सलग ‘पाचवा त्रैवार्षिक-करार’!
